Friday, 29 May 2026

जयंती महामानवांची भाषणाचा अंश

 


आजच्या काळात बोलणे हि जणूकाही क्रांतीच झाली आहे. वर्तमानात अनेक मुद्दे सुरु आहेत. EVM ,एप्सटिन फाईल सारखे मुद्धे आहेतच. त्यासोबत डेलिमिटेशन, जंगलतोड व त्यामुळे झालेली प्रचंड तापमानवाढ, महाबोधी विहार मुक्तीआंदोलन, पालीभाषा आंदोलन,डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या समितीतील आक्षेपार्ह सभासदांची वर्णी आणि अर्थात वर्गीकरण असे अनेक मुद्दे आहेत. वर्गीकरण होऊ नये परंतु जर झालेच तर ते किमान लोकसंख्येचा आधारावर, इम्पिरिकल डेटाच्या आधारावर व्हावे असे साहजिक वाटते.


यानंतर आपण मुख्य विषयाकडे वळूयात तो म्हणजे महामानवांची जयंती. आज १ मे अर्थात कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा असा हा त्रिवेणी संगम. बुद्धांच्या जीवनात वैशाख पौर्णिमेचे विशेष स्थान आहे. बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण. बुद्धांचा जन्म इसवीसन पूर्व ५६३ साली झाला . त्यांच्या वडिलांचे नाव शिद्धोधन व मातेचे नाव महामाया. त्याकाळात गणराज्य पद्धती होती. शक्य गणातील शिद्धोधन हे राजा होते. कपिलवस्तू हे राजधानी होती. या दाम्पत्याला अनेकवर्ष संतानप्राप्ती नव्हती आणि अशातच एका रात्री महामायेला एक सुंदर स्वप्न पडते. सुमेध नावाचे मुनी स्वप्नात येऊन महामायेला तू माझी माता होशील का? अशी विचारणा करतात. एक पांढरा शुभ्र हत्ती महामायेच्या स्वप्नात येतो. या स्वप्नाचा अर्थ विचारण्यासाठी महाराज दुसऱ्या दिवशी आठ विद्वान ब्राह्मणांना पाचारण करतात. ते अर्थबोध सांगतात कि राजे तुम्हाला पुत्ररत्नाचा लाभ होणार आहे तसेच हे बालक सार्वभौम सम्राट होईल किंवा एक संन्याशी बनून जगाचा मार्गदर्शक बनेल, बुद्ध होईल.


बुद्धांच्या जन्माची देखील मोठी रंजक कथा आहे. त्यांचा जन्म लुम्बिनी येथील वनात शाल वृक्षाखाली झाला आहे. त्यांच्या जन्मानंतर असितमुनी नावाचे महान तपस्वीचे आगमन या बालकाला पाहण्यासाठी होते. ते भरल्या डोळ्याने बालकाचे दर्शन घेतात आणि एक दुःखद भविष्यवाणी करतात. ती भविष्यवाणी खरी ठरून अवघ्या ७ दिवसांनी महामायेचे देहावसन होते. बाळाची मावशी महाप्रजापती सर्व लालन पालन करते. सिद्धार्थ बालपणापासून करून आणि गहाण विचार करणारे होते. वयाच्या १२ -१३ व्य वर्षी त्यांचा आत्येभाऊ देवदत्त यासोबत झालेला वाद व बुद्धाची करुणा व दृष्टिकोन आपणास ज्ञात आहे. मारणाऱ्या पेक्षा तारणारा श्रेष्ठ आहे व न्यायासनाने न्यायदान करतांना शिकार करणाऱ्याच्या बाजूने न्यायदान करण्यापेक्षा जीवदान करणाऱ्याच्या बाजूने न्यायदान केले पाहिजे असे पटवून दिले.


बुद्धांचा विवाह हा वयाच्या १६ व्या वर्षी दंडपाणी यांची मुलगी यशोधरा सोबत झाला. वयाच्या २० व्या वर्षी सिद्धार्थ शक्य संघाचे सदस्य झाले. काही वर्षांनी शाक्य आणि कोलीय या गणात रोहिणी नदीच्या पाणीवाटपावरून वाद झाला. शाक्य संघाने व सेनापतीने युद्धाचा निर्णय घेतला या संघाच्या निर्णयाला बुद्धाने विरोध केला व सामोपचाराने चर्चेने वाद मिटवण्याचा पर्याय सुचवला. बुद्धाने संघाच्या विरोधात गेल्याने त्यांना देशत्याग, देहत्याग अथवा सामाजिक बहिष्कार अशा पर्यायांपैकी एक शिक्षा स्वीकारण्याचे सुनावण्यात आले. बुद्धाने परिव्राजक होण्याचा मार्ग स्वीकारला. हि बातमी वायुवेगाने शुद्धोधन, प्रजापती व माता यशोधरे पर्यंत पोहचते. माता यशोधरा सिद्धार्थाच्या निर्णयाला योग्य ठरवून आल्या माता पित्याची व पुत्र राहुलची मी माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत देखभाल करेन. तुम्ही एक असा जीवनमार्ग शोधून काढा कि, तो सकाळ मानवजातीला कल्याणकारी ठरेल. अशी इच्छा व्यक्त करते.


सिद्धार्थ भारतद्वज यांच्याहस्ते माता पिता व पत्नी समक्ष परिव्रजा घेतात. त्यावेळी त्यांचे वय २९ वर्ष असते.

छन्न हा सेवक व कंठक घोडा अनोभा नदीच्या तीरापर्यंत सोबत येतात. सिद्धार्थ आता कपिलवस्तू कडून राजगृहाकडे प्रयाण करतात. राजा बिंबिसार सन्यस्थ होण्यापासून सिद्धार्थाचे मन अनेक प्रलोभने देऊन वळवण्याचा निष्फल प्रयत्न करतात. कपिलवस्तूमध्ये स्त्री-पुरुष घोषणांचे फलक हातात युद्धाचा विरोध करतात व एक लवादमंडळाची स्थापना करून युद्ध कायमचे टाळले जाते.


सिद्धार्थ मात्र परतीचा प्रवास न करता भृगऋषी यांच्याकडे जातात निरनिराळे आत्मक्लेश देणारे तपस्येचे वैराग्य मार्ग तेथे पाहतात. त्यानंतर आलारकालाम यांच्याकडे सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करतात त्यानंतर ते उदक रामपुत्त यांच्याकडून ध्यान व समाधी मार्गाची शिकवणूक घेतात. त्यानंतर निरंजना नदीच्या काठी वैराग्यमार्गाचा अभ्यास करतात. अत्यंत उग्र आत्मक्लेश, पीडा, अन्नत्याग अशी सहा वर्ष जातात. शरिर अगदी जर्जर, पिंजरा व क्षीण होऊन जाते. उरुवेला ठिकाणावरील सुजाताने दिलेल्या खीर प्राशन केल्याने वैराग्य कसोटी भंग होते. त्यानंतर पुन्हा निश्चयाने पिंपळवृक्षाखाली बसून चार आठवडे चार पायऱ्याने त्याने ज्ञान प्राप्त केले.


क्रमश:

0 comments: