Cultivation Of Mind Should Be The
Ultimate Aim Of The Human Existence.
-Dr. B.R. Ambedkar
🌸🌸🌸
बाबासाहेब सांगतात की, धर्माच्या अधिष्ठानावर उभी असलेली जातव्यवस्था ही अशी रचना आहे की ती शोषितांविषयी सहानुभूती निर्माण करत नाही; उलट अस्पृश्यांविरुद्ध ‘धार्मिक रोष’ निर्माण करते. परिणामी, माणसाची न्यायबुद्धी बोथट होते आणि तो धार्मिक शिकवणीच्या प्रभावाखाली अन्यायातही सहभागी होतो. इतकंच नव्हे, तर त्या अन्यायालाच न्याय्य समजू लागतो.
म्हणूनच, सामाजिक परिवर्तनाचा प्रश्न केवळ शोषितांच्या सक्षमीकरणापुरता मर्यादित राहत नाही. उलट, ज्या समाजघटकांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यातच जाणीव (consciousness) निर्माण करणे अधिक महत्त्वाचे ठरते. कारण अन्याय ‘न्याय्य’ आहे अशी धारणा सतत पेरली जाते आणि तीच व्यवस्था टिकवून ठेवते. त्यामुळे या चुकीच्या समजुतींना आव्हान देणारे, त्यांचे चिकित्सक विश्लेषण करणारे आणि नैतिकतेच्या नव्या चौकटी उभ्या करणारे प्रयत्न अत्यावश्यक ठरतात.
व्यक्तीच्या विचारात बदल करणे महत्त्वाचे असते. न्यायव्यवस्था, वकिली आणि धोरणनिर्मिती हाताळणारे हेच, लोक समाजातील नैतिक दिशा ठरवणार आहेत.परंतु अशा जाणीवा शैक्षणिक संस्था क्वचितच निर्माण करतात

0 comments: