Friday, 29 May 2026

जयंती महामानवांची भाषणाचा अंश

 


आजच्या काळात बोलणे हि जणूकाही क्रांतीच झाली आहे. वर्तमानात अनेक मुद्दे सुरु आहेत. EVM ,एप्सटिन फाईल सारखे मुद्धे आहेतच. त्यासोबत डेलिमिटेशन, जंगलतोड व त्यामुळे झालेली प्रचंड तापमानवाढ, महाबोधी विहार मुक्तीआंदोलन, पालीभाषा आंदोलन,डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या समितीतील आक्षेपार्ह सभासदांची वर्णी आणि अर्थात वर्गीकरण असे अनेक मुद्दे आहेत. वर्गीकरण होऊ नये परंतु जर झालेच तर ते किमान लोकसंख्येचा आधारावर, इम्पिरिकल डेटाच्या आधारावर व्हावे असे साहजिक वाटते.


यानंतर आपण मुख्य विषयाकडे वळूयात तो म्हणजे महामानवांची जयंती. आज १ मे अर्थात कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा असा हा त्रिवेणी संगम. बुद्धांच्या जीवनात वैशाख पौर्णिमेचे विशेष स्थान आहे. बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण. बुद्धांचा जन्म इसवीसन पूर्व ५६३ साली झाला . त्यांच्या वडिलांचे नाव शिद्धोधन व मातेचे नाव महामाया. त्याकाळात गणराज्य पद्धती होती. शक्य गणातील शिद्धोधन हे राजा होते. कपिलवस्तू हे राजधानी होती. या दाम्पत्याला अनेकवर्ष संतानप्राप्ती नव्हती आणि अशातच एका रात्री महामायेला एक सुंदर स्वप्न पडते. सुमेध नावाचे मुनी स्वप्नात येऊन महामायेला तू माझी माता होशील का? अशी विचारणा करतात. एक पांढरा शुभ्र हत्ती महामायेच्या स्वप्नात येतो. या स्वप्नाचा अर्थ विचारण्यासाठी महाराज दुसऱ्या दिवशी आठ विद्वान ब्राह्मणांना पाचारण करतात. ते अर्थबोध सांगतात कि राजे तुम्हाला पुत्ररत्नाचा लाभ होणार आहे तसेच हे बालक सार्वभौम सम्राट होईल किंवा एक संन्याशी बनून जगाचा मार्गदर्शक बनेल, बुद्ध होईल.


बुद्धांच्या जन्माची देखील मोठी रंजक कथा आहे. त्यांचा जन्म लुम्बिनी येथील वनात शाल वृक्षाखाली झाला आहे. त्यांच्या जन्मानंतर असितमुनी नावाचे महान तपस्वीचे आगमन या बालकाला पाहण्यासाठी होते. ते भरल्या डोळ्याने बालकाचे दर्शन घेतात आणि एक दुःखद भविष्यवाणी करतात. ती भविष्यवाणी खरी ठरून अवघ्या ७ दिवसांनी महामायेचे देहावसन होते. बाळाची मावशी महाप्रजापती सर्व लालन पालन करते. सिद्धार्थ बालपणापासून करून आणि गहाण विचार करणारे होते. वयाच्या १२ -१३ व्य वर्षी त्यांचा आत्येभाऊ देवदत्त यासोबत झालेला वाद व बुद्धाची करुणा व दृष्टिकोन आपणास ज्ञात आहे. मारणाऱ्या पेक्षा तारणारा श्रेष्ठ आहे व न्यायासनाने न्यायदान करतांना शिकार करणाऱ्याच्या बाजूने न्यायदान करण्यापेक्षा जीवदान करणाऱ्याच्या बाजूने न्यायदान केले पाहिजे असे पटवून दिले.


बुद्धांचा विवाह हा वयाच्या १६ व्या वर्षी दंडपाणी यांची मुलगी यशोधरा सोबत झाला. वयाच्या २० व्या वर्षी सिद्धार्थ शक्य संघाचे सदस्य झाले. काही वर्षांनी शाक्य आणि कोलीय या गणात रोहिणी नदीच्या पाणीवाटपावरून वाद झाला. शाक्य संघाने व सेनापतीने युद्धाचा निर्णय घेतला या संघाच्या निर्णयाला बुद्धाने विरोध केला व सामोपचाराने चर्चेने वाद मिटवण्याचा पर्याय सुचवला. बुद्धाने संघाच्या विरोधात गेल्याने त्यांना देशत्याग, देहत्याग अथवा सामाजिक बहिष्कार अशा पर्यायांपैकी एक शिक्षा स्वीकारण्याचे सुनावण्यात आले. बुद्धाने परिव्राजक होण्याचा मार्ग स्वीकारला. हि बातमी वायुवेगाने शुद्धोधन, प्रजापती व माता यशोधरे पर्यंत पोहचते. माता यशोधरा सिद्धार्थाच्या निर्णयाला योग्य ठरवून आल्या माता पित्याची व पुत्र राहुलची मी माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत देखभाल करेन. तुम्ही एक असा जीवनमार्ग शोधून काढा कि, तो सकाळ मानवजातीला कल्याणकारी ठरेल. अशी इच्छा व्यक्त करते.


सिद्धार्थ भारतद्वज यांच्याहस्ते माता पिता व पत्नी समक्ष परिव्रजा घेतात. त्यावेळी त्यांचे वय २९ वर्ष असते.

छन्न हा सेवक व कंठक घोडा अनोभा नदीच्या तीरापर्यंत सोबत येतात. सिद्धार्थ आता कपिलवस्तू कडून राजगृहाकडे प्रयाण करतात. राजा बिंबिसार सन्यस्थ होण्यापासून सिद्धार्थाचे मन अनेक प्रलोभने देऊन वळवण्याचा निष्फल प्रयत्न करतात. कपिलवस्तूमध्ये स्त्री-पुरुष घोषणांचे फलक हातात युद्धाचा विरोध करतात व एक लवादमंडळाची स्थापना करून युद्ध कायमचे टाळले जाते.


सिद्धार्थ मात्र परतीचा प्रवास न करता भृगऋषी यांच्याकडे जातात निरनिराळे आत्मक्लेश देणारे तपस्येचे वैराग्य मार्ग तेथे पाहतात. त्यानंतर आलारकालाम यांच्याकडे सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करतात त्यानंतर ते उदक रामपुत्त यांच्याकडून ध्यान व समाधी मार्गाची शिकवणूक घेतात. त्यानंतर निरंजना नदीच्या काठी वैराग्यमार्गाचा अभ्यास करतात. अत्यंत उग्र आत्मक्लेश, पीडा, अन्नत्याग अशी सहा वर्ष जातात. शरिर अगदी जर्जर, पिंजरा व क्षीण होऊन जाते. उरुवेला ठिकाणावरील सुजाताने दिलेल्या खीर प्राशन केल्याने वैराग्य कसोटी भंग होते. त्यानंतर पुन्हा निश्चयाने पिंपळवृक्षाखाली बसून चार आठवडे चार पायऱ्याने त्याने ज्ञान प्राप्त केले.


क्रमश:

Sunday, 29 December 2024

कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृतिदिन

 



नाशिकच्या १२ किलोमीटर आणि उत्तरेस आंबे दिंडोरी नावाच गाव आहे.  येथेच लोकनेते पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा जन्म 15 ऑक्टोंबर 1902 रोजी पवळाबाई यांच्या पोटी झाला. त्याच मुलाचे नाव किसन भाऊंनी भाऊराव असे ठेवले.


०१ जानेवारी 1927 रोजी कोरेगाव जिल्हा पुणे येथील विजय स्तंभावर झालेल्या सभेत भाषण करून दादासाहेब गायकवाड यांनी आपले नाव प्रथम महाड येथील सत्याग्रहात भाग घेण्यासाठी नोंदवली होते आणि बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात त्यांचे नाव एक सत्याग्रही म्हणून नोंदवली होते. त्या सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते.


20 मार्च, 1927 परिषदेच्या शेवटी जो हल्ला होता. त्याची सर्व इथंबूत माहिती नावांनीशी गोळा केली आणि निरपराराध अस्पृश्यांवर एकदम हल्ला करणाऱ्या गुंडाविरुद्ध कोर्टात खटले भरले गेले चार- पाच महिन्यांनी त्या खटल्याचा निकाल लागून सात-आठ गुंड मोरक्यांना प्रत्येकी चार महिन्यांची सश्रम करावासाची शिक्षा देखील झाली. यासगळ्यात दादासाहेबांनी काम केले होते.


इसवी सन 1930 साल उजाडले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी 2 मार्च, 1930 रोजी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची रणशिंग फुंकले. 


रविवारी 13 ऑक्टोबर, 1935 रोजी येवला येथील परिषद भरली. अस्पृश्य समाजातील सुमारे 50 हजार लोक त्या परिषदेला हजर होते. या परिषदेचा प्रचार करताना दादासाहेब आपल्या सहकाऱ्यांसह कधी पाई कधी सायकलवर तर क्वचित मोटरने प्रवास करीत.


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन. दादासाहेब गायकवाड यांना  16605 मते 25 फेब्रुवारी 1937 रोजी पडली व त्यांचा विजय झाला.


14 एप्रिल 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 45 वा वाढदिवस येवला येथे मोठी जाहीर 

परिषद घेऊन साजरा करण्यात आला या परिषदेत दादासाहेबांचे बाबासाहेबांनी अभिनंदन केले.


बाबासाहेबांच्या पश्चात  बाबासाहेबांच्या शवाला साक्ष ठेवून दिनांक 7 डिसेंबर, 1956 रोजी चैत्यभूमीवरच 25 लाख अनुयायांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने बौद्ध धर्माची दीक्षा भदंत आनंद कौशल्यन यांनी त्रिशरण पंचशीलाच्या उच्चाराने दिली.


1957 च्या सार्वजनिक निवडणुकीत शेकाफ हे पक्षाला चांगले यश मिळाले त्यात 21 आमदार आणि 11 खासदार निवडून आले.


दिनांक 3 ऑक्टोबर 1957 रोजी पक्ष स्थापन करण्यासाठी देशाच्या विभागातून नेते कडे नागपूरला एकत्र आले होते. त्याच दिवशी या पक्षाची  स्थापना झाली. अध्यक्ष रावबहाद्दूर एन  शिवराज, जनरल सेक्रेटरी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे व सदस्य दादासाहेब गायकवाड, बी सी कांबळे इत्यादी होते.


खासदार बी.सी कांबळे यांनी 14 मे, 1959 रोजी नागपूर येथे पक्षाचे अधिवेशन भरवले आणि तेथेच त्या दिवशी आपला दुरुस्त गट स्थापन केला व त्याला दुरुस्त रिपब्लिकन पक्ष कांबळे गट म्हणण्यात येऊ लागले.


6 डिसेंबर, 1964 ला देशव्यापी भूमीहीनांचा सत्याग्रह कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. हा सत्याग्रह एवढा प्रचंड होता की दोन महिन्यात संबंध भारतातून तीन लाख 40 हजार सत्याग्रही तुरुंगात गेले त्यात सर्व जाती-जमातींची भूमिहीन शेतकरी होते.


दादासाहेब गायकवाड  पंधरा वर्षे खासदार होते आपल्या भाषणातून त्यांनी पार्लमेंट गाजवली होती. 29 डिसेंबर, 1971 चा तो काळा दिवस ठरला त्याच दिवशी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी जगाचा निरोप घेतला.


यांच्या कार्यास आणी त्यागास विनम्र अभिवादन..!💐🙏

Friday, 20 January 2023

तथागत भगवान गौतम बुद्ध हे राजपुत्र होते. संपूर्ण जीवन ते ऐशोआराम सहज व्यतीत करू शकले असते. 


चक्रवर्ती सम्राट अशोक हे काश्मीर पासून ते अफगाणिस्तान पर्यंत असणाऱ्या प्रचंड भव्य अशा राज्याचे राजा होते. ते देखील बुद्धीच्या विचारांना शरण आले. जनकल्याण करणारा

 अद्वितीय जनकल्याण करणारे राजा बनले.


राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी पुणे मुंबई महामार्ग बांधकाम केले. मुंबई सी एस टी स्टेशन बांधकाम केले. मुंबई मनपा इमारत बांधकाम केले. खडकवासला धरण, कालवे, कात्रजचा बोगदे, येरवडा पुल, राजवाडे, रस्ते, कापड गिरण्या, घरे इ. बांधकाम केले. १८ व्या शतकात जमशेदजी टाटा यांची संपत्ती २० हजार रुपये होती, तेव्हा महात्मा फुले यांची संपत्ती त्याहून कितीतरी अधिक होती. 


शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानिकाचे राजे होते. सामाजिक न्यायाची वादातीत भूमिका त्यांनी बजावली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैयक्तिक संपत्ती मुंबई (दादर), खार, तळेगाव दाभाडे, कोकण, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद, बंगलोर आणि दिल्ली येथे होती. अनेक ठिकाणी आजही आहे.  


आपण ज्या समाज सुधारकांच्या विचारांचा वसा चालवू इच्छीतो 

ते कुणी लुंगे-सुंगे नव्हते. त्यांनी ठरवले असते तर ते वैयक्तिक जीवन ऐशो-आरामात सहज व्यतीत करू शकले असते. परंतु त्यांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण जीवन खर्च केले.


 या सगळ्यातुन मला एवढंच सांगायचं आहे की,

आपले आदर्श हे तू लढ मी उपदेश करतो किंवा तू लढ मी पाठीशी आहे असे म्हणणारे अथवा इंग्रजांची माफी मागणारे, पंचगव्य प्राशन करणारे नव्हते. आपल्या चळवळीला समृद्ध, संपन्न आणि आदर्श असा वारसा आहे. त्यामुळे आपण इतर कुठल्याही मार्गाला अथवा प्रलोभनात्म प्रबोधनाला बळी पडू नये.

Thursday, 17 September 2020

आज विशेष

 


ते १९३३ या कालखंडात बौद्ध शिक्षा, बौद्ध संघ, विहार व अनेक दवाखाने निर्माण केले. १८ सप्टेंबर १८९३ साली शिकागो मध्ये संपन्न झालेल्या विश्वधर्म परिषदेत स्वामी वेवेकानंदांना भाषणाची संधी उपलब्ध करून देणारे #आनागारिक धम्मपाल.. 

जन्म १७ सप्टेंबर १८६४


द्रविड सांस्कृतिक भाषा, राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते व धर्मांधतेच्या मुर्त्या चौका-चौकात चपलीने बडवणारे महानायक #पेरियार ई. वी रामसामी

जन्म :१७ सप्टेंबर १८७९


ठाकरी शैली, प्रबोधनकार.. 

"दगलबाज शिवाजी", "देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे", "भिक्षुक्षाहीचे बंड" असे पुस्तक लेखक #केशव सीताराम ठाकरे....

जन्म : १७ सप्टेंबर १८८५


मार्क्सवादावर भारतीय दृष्टिकोनातून प्रकाश टाकणारे प्रचविद्या पंडित, सैद्धांतिक मर्क्सवादाची मांडणी करणारे, वर्ण-वर्ग-जात-स्त्रीदास्याचा अंत करणारा साम्यवाद मांडणारे  #कॉम्रेड शरद पाटील..

जन्म: १७ सप्टेंबर १८७९


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक, भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा #यशवंतराव भिमराव आंबेडकर

 मृत्यू :१७ सप्टेंबर १९७७