Saturday, 20 September 2025

परिवर्तन


 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म का स्वीकारला त्याचं स्पष्ट आणि सरळ उत्तर बाबासाहेबांनी दिल आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की, बाबासाहेबांनी अनेक धर्मांचा आणि पंथांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांना त्यांच्या बुद्धीला पटला. तो धम्म, ते विचार त्यांनी स्वीकारले आहेत. त्यामुळे विचारांच आपलं एक महत्त्व आहे. यात काही शंका नाही. 


परंतु अडीच हजार वर्षांपूर्वी जो धम्म या देशाचा प्रमुख जीवन मार्ग होता. तो धम्म या भूमीवरती संपुष्टात आला होता. अर्थात बाबासाहेबांनी जर त्याला  पुनर्जीवित केले नसते; तर भारतात बौद्ध धम्म पुन्हा गतिमान झाला असता का? तर याचे उत्तर नाही असे मिळते. 


त्यामुळे सदर दोन मुद्द्यातून हे स्पष्ट होते विचार चांगले असले की ते कालातीत असतात. परंतु असे असले तरी त्या विचारांचे लोक,विचार प्रचार प्रसार व संरक्षण करणारे लोक जर नसतील; तर विचार कितीही चांगला असला तरी तो कायमचा संपुष्टात येऊ शकतो. हे बाबासाहेबांनी देखील म्हटले आहे.


त्यामुळे वरील मुद्द्यातून हे स्पष्ट होते की विचाराला राजश्रय आणि लोकाश्रय दोन्हीही मिळाले तरच तो टिकतो. आजच्या भाषेत राजकीय पाठबळ असेल तरच अधिक विस्तृत होतो.


उदाहरण दाखल आपण बुद्धांकडे वळूया. बुद्ध हे राजपुत्र होते. बुद्ध हे अडीच हजार वर्षांपूर्वी राजपुत्र होते आणि साधेसुधे राजपुत्र नसून सुखाच्या पायघड्या त्यांच्या पायाशी लोळण घालत होत्या असे अत्यंत विलासित जीवन ते व्यतीत करत होते. आता विचार करा अडीच हजार वर्षांपूर्वी असा सुंदर आणि श्रीमंत राजपुत्र जर गृहत्याग करत असेल तर त्याचा परिणाम  इतर जनमानसात व राज संबंधात सर्व दूर पोहोचल्यानंतर त्याचे ऐतिहासिक परिणाम होणार नाहीत का? मला येथे सांगायचं आहे की बुद्ध हे राजपुत्र होते.  सत्तेशी- शक्तीशी जवळचे असल्यामुळे जनमानसावरती ऐतिहासिक प्रभाव टाकणे व पडणे साहजिक होते. त्या काळात अहिंसा,शांतता प्रिय इतरही धर्म, पंथ ,विचार व प्रचारक होते. अडीच हजार वर्षांपूर्वी गृहत्याग करून अंतिम सत्य शोधण्यासाठी न जाणो कित्येक जीव डोंगरदर्या खोऱ्यात फिरत होते. बुद्धांच वेगळ पण त्यांच्या सामान्यजनापासून वेगळ असण्यात आहे. त्यांच्या राजपुत्र असण्यात आहे. हे मला येथे नमूद करावयाच आहे. विचार करा जर बौद्ध धम्माला राजश्रय प्राप्त झाला नसता. तर त्याला लोकश्रय प्राप्त झाला असता का? देशा परदेशात धम्म पोहोचु शकला असता काय?


अजून उदाहरण पाहू. लक्षात घ्या बुद्ध राजपुत्र होते. महात्मा फुले हे एक श्रीमंत आजच्या भाषेत बिल्डर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील त्या काळात मिलिटरी मध्ये शिक्षक होते. जेव्हा दलितांना शिक्षणाचा गंध देखील नव्हता. तेव्हा बाबासाहेब या जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये पदव्या घेत होते. बाबासाहेब जेव्हा मॅट्रिक उत्तीर्ण झाले तेव्हा दस्तूरखुद्द केळुस्कर गुरुजी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला आहे. राजश्री शाहू महाराजांचा राजश्रय त्यांना लाभला आहे. सयाजीराव गायकवाड यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे. ही गोष्ट त्या काळातली आहे जेव्हा अस्पृश्यांना माणूस म्हणून जगण्याचाही अधिकार नव्हता. लक्षात घ्या बाबासाहेब ब्रिटिश राजवटीत देखील प्रबळ नेता व मंत्री होते. गांधींच्या व काँग्रेसच्या काळात देखील ते संविधानाचे निर्माते व मंत्री होते. सत्ता आणि शक्ती बाबासाहेबांचा हातात असल्यामुळे अनेक धाडसी निर्णय व कार्य ते करू शकले. ही सत्तेची किमया बाबासाहेब भलीभाती जाणत होते.


मला येथे हे सांगायचं आहे की ही चळवळ चालवण्यासाठी राजश्रय व लोकश्रय खूप महत्त्वाचा असतो. शक्तीचे स्त्रोत तुमच्या हातात असल्याखेरीज तुम्ही विधायक काम करू शकत नाहीत. सम्राट अशोक जर राजा नसते तर ते इतके शिलालेख व धम्मकार्य निर्माण करू शकले असते काय? ते शिलालेख लिहिणाऱ्या किती सामान्य कारागिरांची नावे आपल्याला ज्ञात आहेत? त्यामुळे सत्ता नेहमी महत्त्व ठेवून असते.


मार्क्सवादाचे उदाहरण घेऊ. कार्ल मार्क्स हयात असताना मार्क्सवाद किती फोफावला? आणि त्यानंतर लेनिन जेव्हा सत्तेत आला त्यानंतर मार्क्सवादाचे स्वरूप आणि आवाका किती मोठा होता हे आपण नजरेआड करून चालणार नाही.


आता वर्तमानाकडे येऊ या. भारतातील जेवढे काय म्हणून अब्जाधीश श्रीमंत लोक आहेत ते आपसूकच जातीने सवर्ण वर्गातून कसे येतात? संख्येने केवळ तीन ते पाच टक्के असणारे हे लोक भारतीय अब्जाधीशांच्या यादीत 90 ते 95 टक्के जागा व्यापून आहेत. हा केवळ योगायोग नाही. जगभरात देखील स्थिती काही फार वेगळी नाही. जगभरातील 90% साधन संपत्ती ही केवळ तीन ते पाच टक्के लोकांकडे आहे. आणि तरीही सर्व काही अलबेल सब चंगा सुरू आहे.


या देशातील जेलमध्ये जाणारे लोक बेल न मिळाल्याने जेलमध्ये कोंबलेले लोक कोणत्या वर्णाचे व कोणत्या वर्गाचे आहेत? हे गुपित सत्य आहे.


या देशातील सर्वोच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टातील जज कोण आहेत. या देशातील निरनिराळ्या इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्री, व्यापार, सोने-चांदीचे, हिरे व्यापार, शेकडो एकर जमिनीचे मालक कोण आहेत हे उघड सत्य आहे.


ललित मोदी, नीरव मोदी, मेहुल चौकसी, विजय मल्या, जतिन मेहता या सर्वांची जातकुळी कोणती? 

एका ठराविक वर्गाच्या हातात येथील व्यवस्था राहिली आहे. नीरा रडिया टेप केस यांची साठ गाठ उघडी पाडते. 


देशातील गरीब जनतेला मग डुकरांना कोंबावे व खाणे द्यावे तशी स्थिती आहे. ८० कोटी लोकांना अल्पदरात (निकृष्ट) धान्य दिले जाते. लाडकी बहीण, भाऊ योजना दिली जाते. मूळ समस्यांवर बगल देऊन. धर्मांधतेची फोडणी दिली जाते.


हे सगळे बदलण्यासाठी व विधायक रित्या परिवर्तन करण्यासाठी बहुसंख्य बहुजनांने आर्थिक सत्तेचे, राजकीय सत्तेचे महत्व समजून घेतले पाहिजे व त्या अनुषंघाने नियोजन केले पाहिजे इतकंच.

Sunday, 31 August 2025

तुमचा पुरोगाम्यांवर विश्वास नाही. का?

 



तुमचा पुरोगाम्यांवर विश्वास नाही. का? त्यांनी असे काय करावे ज्यामुळे विश्वासार्हता येईल?

सदर प्रश्नावर माझे उत्तर मी येथे देत आहे.

———-

भारत स्वातंत्र्य झाला. परकीय उच्चभ्रू इंग्रजांकडून भारतीय उच्चभ्रू नेत्यांकडे शक्तीचे हस्तांतरण करण्यात आले. ते आजतागायत राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा अनेक आघाड्यांवर टिकून आहे. त्यामुळे लोकशाही हि जरी "एकमत म्हणजे एक मूल्य" असे कागदोपत्री सांगत असली तरी; हि बहुसंख्य प्रतिनिधित्व लोकशाही आहे. तुमच्या मताला येथे केराची टोपली दाखवली जाते हि वास्तविकता आहे. अनुपाती प्रतिनिधित्व (Proportional Representation) देणारी निवडणूक पद्धती असती तर आपल्याला तसे म्हणत आले नसते. स्वातंत्र्यानंतरही अशी व याहून विदारक स्थिती असल्या कारणाने येथील बुद्धिजीवीवर्ग काय करतोय हे पाहणे क्रमप्राप्त होते .


पुरोगामीवर्ग हा भारतीय बुद्धीजीवी वर्ग आहे आणि तो उच्चभ्रू देखील आहे. तो खरंच बुद्धिजीवी आहे का तो विषय निराळा. असो.  तरीही अशी एक साधारण मान्यता आहे. जनसामान्य नेहमी या उच्चभ्रू / बुद्धिजीवी वर्गाचे अनुकरण करत असतो. त्यामुळे या वर्गावर आपसूकच अधिकची नैतिक जबाबदारी येते. पुरोगामी हे आंबेडकरी चळवळीचे उघड मित्र आहेत? बाबासाहेबांमुळे जसे गांधीजी बदलत व अधिक वृद्धिंगत होत गेले. असे पुरोगामी म्हणतात. तसे पुरोगम्यांनी देखील आंबेडकरवाद्यांकडून शिकावे व अधिक व्यापक व मूळ भूमिकेवर यावे असे माझे मला वाटते. 


त्यामुळे तत्सम बुद्धीजीवी वर्गाने केवळ आंबेडकरी विचारमंचावर, आंबेडकर नगरात, आंबेडकरी जनतेला बुद्ध आणि बाबासाहेब भाषणातून सांगण्याची तितकीशी गरज उरली नाही. त्या उलट इतर मोठमोठ्या वस्तीत, सण-उत्सवात प्रामुख्याने प्रबोधनाचे कार्यक्रम करावेत.ज्यांच्यावर अन्याय झालाय व ज्यांनी बौद्धधम्म व आंबेडकरवाद स्वीकारलाय अशा शोषितांनाच भाषणं देण्यात काय हाशील ? शोषितांचे नेतृत्व हडपण्याची ही कला असू शकते फार तर. जे अन्याय करतात आणि जे शोषक आहेत त्यांचे परिवर्तन पुरोगाम्यानी करावे. ते खरे कार्य होईल.


आंबेडकर वादाचा अभ्यास व अनुभव आंबेडकरवाद्यांना जास्त आहे. आंबेडकरी विचारवंत केवळ एट्रोसिटी व समाजकल्याण विभाग यापुर्ती सीमित नाहीत. त्यामुळे पुरोगाम्यांनी आंबेडकरी नेत्यांना व विचारवंतांना त्यासाठी पाचारण करावे. यासाठी त्यांनी श्रीधर टिळकांचा आदर्श घ्यावा.


या पुरोगामी / बुद्धीजीवी मंडळीने श्रीधर टिळकांच्या प्रमाणे SSD स्थापन करावी. नुसते भाषण न देता कृतीतून रिपब्लिकन, वंचित सारख्या पक्षात प्रवेश करावा. धर्मांतर करून बौद्ध व्हावे. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, पाठिंबा द्यावा. बाबासाहेब स्वीकारताना संविधानिक बाबासाहेब, राजकीय बाबासाहेब व धार्मिक बाबासाहेब असे वेगवेगळे व सोईस्कर बाबासाहेब न स्वीकारता समग्र बाबासाहेब स्वीकारावेत. भाषणात बाबासाहेबानी १९५६ धम्मक्रांती केली सांगायची आणि व्यक्तिगत जीवनात अंगीकार नाही करायचा. हा मुखवटेबाजपणा नव्हे काय? बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, लोकशाही सामाजिक समतेशिवाय चालू शकत नाही.


स्कॉलरशिप, आरक्षण, एट्रोसिटी, बैकलॉग भरणा, जल-जमीन-जंगल समान वाटप, झोपडपट्टी बचाव यासाठी मोर्चात यावे. मोर्चात येऊन, नेते न बनता. कार्यकर्ता बनावे. शाहू महाराजांकडून हे गुण त्यांनी शिकावेत. 

पुरोगामी व प्रतिगामी अशा दोन्ही छावण्यात नेतृत्व उच्चवर्णीय असेल तर झाले कल्याण. त्यामुळे आंबेडकरवादी चळवळीने खोट्या पुरोगामी, बुद्धिजीवी लोकांपासून अंतर ठेवावे, यामागे काही मूलभूत वैचारिक आणि व्यावहारिक कारणे देखील आहेत. 


वैचारिक भिन्नता:

आंबेडकरवादी चळवळ ही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित आहे, जी प्रामुख्याने जातीव्यवस्थेच्या विरोधात आणि शोषित-वंचित समाजाच्या उत्थानासाठी लढते. पुरोगामी विचारसरणी, जरी ती सामाजिक बदल आणि समानतेची भाषा बोलत असली, तरी बऱ्याचदा ती उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय दृष्टिकोनातून येते. यामुळे ती जातीच्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने समजून घेण्यात किंवा त्यावर ठोस उपाययोजना करण्यात कमी पडते. बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता, कारण ती प्रत्यक्षात जातीच्या मुद्द्यांना टाळते किंवा त्यांचे गांभीर्य कमी करते.


त्यांचे लक्ष प्रामुख्याने आर्थिक विषमता, धर्मनिरपेक्षता किंवा इतर व्यापक मुद्द्यांवर असते. याउलट, आंबेडकरवादी चळवळीचा मुख्य केंद्रबिंदू आहे जातीचा प्रश्न आणि त्यामुळे होणारा सामाजिक भेदभाव आहे. 


सांस्कृतिक आणि ऐतिहासिक फरक:

पुरोगामी विचारसरणी बऱ्याचदा हिंदू धर्मातील सुधारणांवर आधारित असते, ज्यामध्ये हिंदू संस्कृती आणि परंपरांचा स्वीकार काही प्रमाणात असतो. याउलट, आंबेडकरांनी हिंदू धर्मातील जातीव्यवस्था आणि त्याच्या मूळ संरचनेला नाकारले आणि बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे आंबेडकरवादी चळवळ हिंदू संस्कृतीच्या सुधारणांपेक्षा संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनावर भर देते. पुरोगामी लोकांचा हिंदू संस्कृतीशी असलेला संबंध आंबेडकरवादी चळवळीच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत आहे. 


राजकीय स्वार्थ आणि वापर:

बऱ्याचदा पुरोगामी गट किंवा राजकीय पक्ष आंबेडकरवादी चळवळीचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी करतात, पण दलित आणि शोषित समाजाच्या खऱ्या समस्यांना प्राधान्य देत नाहीत. उदाहरणार्थ, काही राजकीय पक्ष आंबेडकरांचे नाव घेतात, पण त्यांच्या विचारांचा खरा अंमल करताना दिसत नाहीत. अन्याय अत्याचाराच्या शेकडो घटना या काळात घडल्या आहेत. त्यावेळी पुरोगामी भाषणबाज लोक मुग गिळतात.  न्याय मिळत नाही. खैरलांजी, सोनाई, शिर्डी, जवखेडा, नितीन आगे, लातूर, बुलढाणा शेकडो प्रकरणात न्याय नाही. ७००० प्रकरण प्रलंबित आहेत. याउप्पर बावडा, वरळी दंगल, बीडीडी चाळ, नामांतर, पँथरवर केसेस, हिंदू कोड बील प्रकरण असे अनेक ठळक हल्ले झालेत ज्यात वेळेवर न्याय नाही.

मंडल कमिशन असेल,आरक्षणचा बॅकलॉक असेल, शिष्यवृत्ती कपात असे अनेक विषय आहेत. ज्यांत  न्यायसंगत भूमिका नाही किंवा अनुल्लेखाने मारण्याचे प्रकार आहेत. 

 

पुरोगामी राजकीयसत्ता बदलाची भाषा व अवाहन करत असतात. परंतु सत्ता असताना ते अपेक्षित कार्य करत नाहीत. राजकीय सत्ताबदल हे कागदोपत्री होत असतात. त्याउप्पर सांस्कृतिक सत्ताबदल हा मोठा, स्थायी व करण्यास अवघड असतो. पुरोगामी प्रतिगाम्यांसोबत साटेलोटे असल्यासारखे उगी मलमपट्टी करत बसतात. समग्र परिवर्तन करण्यासाठी व खरा सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय बदल करण्याची प्रामाणिक धमक दाखवत नाही.


स्वायत्ततेची गरज:

अल्पसंख्यांकांना जगभरात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वायत्ततेची गरज लागते.

आंबेडकरवादी चळवळीने आपली स्वायत्तता आणि स्वतंत्र ओळख कायम ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून ती आपल्या ध्येयापासून विचलित होणार नाही. पुरोगामी गटांशी खूप जवळीक ठेवल्यास चळवळीचे मूळ उद्दिष्ट, म्हणजे दलित आणि शोषित समाजाचे सक्षमीकरण, धोक्यात येऊ शकते. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनसारख्या स्वतंत्र संस्था स्थापन करून ही स्वायत्तता दाखवली होती.

Thursday, 19 June 2025

भांडा सौख्यभरे

 



नातं कोणतही असो मित्र-मैत्रिणीच, पती-पत्नीच, भावा- भावच, बाप-लेकाच अथवा दुसरे कोणत. नात्यात कायम गोडी गुलाबीचे दिवस असत नाहीत. असले तर त्या नात्यात कुणीतरी एक वरचढ अथवा एडजस्टमेंट करत असतो. भांडण अथवा चर्चा ही अनेकदा दोन स्पर्धकांमध्ये होत असते. बॉस आणि कर्मचारी यांत ऑर्डर्स दिल्या व पाळल्या जातात. तेथे भांडण उद्दभवत नाही. झालीच तर धुसफूस होते. कारण भांडण करण्यासाठी बोलण्याचं व मत मांडण्याचे स्वातंत्र्य असणे ही पूर्वअट असते. नात्यात भांडण होत नसेल तर शक्यता आहे की, ते दिखावू असेल. कारण म्हणतात ना शेंदूर खर्वडल्याशिवाय देव की दगड हे कळत नसत.


भांडणाने अनेकदा मुद्याची चिकित्सा,समीक्षा होते. त्या मुद्याचे निरनिराळे कांगोर समोर आणले जातात. माझा मुद्दा किंवा माझे मत कसे बरोबर आहे हे पटवण्यासाठी अनेक अंगाने विचार मांडले जातात. समरूप उदाहरण दिली जातात. तुमच्या ज्ञानाची, अनुभवाची, भाषेची, व्यक्तिमत्वाची, आकलनाची, पटवण्याच्या क्षमतेची तेथे कसोटी लागते.


तुमचा मुद्दा पटवून देताना तुम्ही कसली मदत घेता त्यावरून तुमची स्व:ची ओळख समजत असते. तुम्ही तत्वद्यानाची व वैचारिक भिस्त लढवता? शिव्या श्राप व हिंसक भाषेवर उतरता? हात पाय चालवून बळाचा वापर करता? हे सगळं तुमच्या आतील माणसावर, कळत नकळत घडलेल्या संस्कारावर अवलंबून असते.



अनेकदा आपण कशासाठी कुणासाठी व कुणासोबत भांडत आहोत हेच अनेक लोक विसरून जातात व भांडण हा मुद्दा बनतो. मुद्यावर भांडण राहत नाही. त्यातून काय मिळणार याचा विचार बाजूला पडून काय बरोबर या पेक्षा मी बरोबर यावर लोक भांडत बसतात. या अहंकार व मी पणाच्या भांडणाला अंत राहत नाही. त्यामुळे मूर्खांशी भांडण देखील करू नये असे म्हणतात ते उगीच नाही.


तुमच्या जिवनात तुमच जिवन समृद्ध करणारे भांडखोर लोक आहेत की कायम मानसिक उच्छाद मांडणारे लोक आहेत यावर खूप काही निर्भर करते.


कॉन्फिडेंट असणारे अनेक लोक मला मूर्ख, श्रीमंत असणारे सरंजामी व भांडणारे स्पष्टोक्ते वाटतात.

Sunday, 18 May 2025

बुद्ध पोर्णिमा (१२ मे, २०२५) पोस्ट क्रमांक ०३

बुद्ध पोर्णिमा (१२ मे, २०२५)    पोस्ट क्रमांक ०३

 


————————————

बौद्ध धम्म हा रूढ अर्थाने धर्म नसून ते तत्त्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान शिकवण्याची बौद्ध धम्म ही एक शिक्षण पद्धती आहे. स्वतः भगवान गौतम बुद्ध वयाची ४५ वर्ष चारिका करून धम्म सांगतात, धम्म शिकवतात. स्वतः तथागत भगवान बुद्ध एक आदर्श शिक्षक,गुरु आहेत. त्यांनी निर्माण केलेला संघ ज्याला आदर्श शिक्षण दिले जात होते. व तो संघ जगभरात बौद्धतत्त्वज्ञानाची शिकवण सद्धधम्माची शिकवण, शिक्षण देत होता. या धम्म आणि संघापासून निर्माण झालेली विहारे, लेण्या हे बौद्ध शिक्षणाचे शैक्षणिक स्थान होते. 


बौद्ध धम्माचा हेतूच या जगाची पुनर्रचना करणे हा आहे. त्यासाठी धम्मात माणसाच्या मनाला योग्य वळण लावण्यावर सर्वाधिक भर दिला गेला आहे. बुद्ध धम्मात (प्रतुत्य समुत्पादात) सर्व दुःखाचे मूळ कारण म्हणजे अज्ञान असे सांगितले आहे. माणसाचे अज्ञान नष्ट करण्यासाठी त्याला योग्य ते शिक्षण दिले पाहिजे. शिक्षणात त्याची प्रगती होण्यासाठी त्यांनी आपले मन केंद्रित केले पाहिजे .कारण शीलवान मनुष्य आपले मन केंद्रित करू शकतो. जो मनुष्य शीलवान नाही; तो आपले मन केंद्रित करू शकत नाही. त्याचे मन इकडे तिकडे भटकत राहते म्हणून खरंतर बौद्ध धम्मात मनाच्या संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नीतिमत्ता, मनाची एकाग्रता आणि यथाभूत ज्ञान आलेले शहाणपण म्हणजेच शील,समाधी आणि प्रज्ञा या भगवान बुद्धांनी दाखवल्या मार्गाच्या पायऱ्या शिकविल्या जातात. 


तथागत भगवान गौतम बुद्धांची शिकवण्याची एक पद्धती होती. ते त्यांना जो सांगावयाचा मुद्दा आहे. त्याचे पूर्ण विश्लेषण करून सांगत. त्या मुद्द्याचे बारीक-सारीक अंग प्रत्यांग सांगितले जायचे. आपला मुद्दा पटवून देताना भगवान बुद्ध उपमा, उत्पेक्षा रूपक यांचा वारंवार उपयोग करीत असत. प्रामुख्याने दररोजच्या व्यवहारात आढळणाऱ्या उदाहरणांचा दाखला दिला जात असे. तथागत प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देत असत. चर्चेतून त्या मुद्द्याला अधिक स्पष्ट करून सांगावयाला ते लावत असत. जर त्यांना तो मुद्दा आवडला नाही तर त्याबद्दल ते विरोधी पक्षाची हेटाळणी करत नसत. तर ते विरोधी पक्षाला प्रश्न विचारून अधिक गोंधळात पाडत असत. त्या प्रतिप्रश्नांमुळे विरोधी पक्षाला मिथ्या धारणांची जाणीव करून देत असत. किंबहुना त्याच्याकडून त्या मिथ्या धारणेबद्दल वदवून घेत असत. अशा तऱ्हेने प्रश्नोत्तरांची अनेक उदाहरणे  सुत्त पिटक, विनयपिटकात जागोजागी पाहावयास मिळतात. 


तथागत भगवान गौतम बुद्ध चर्चा करतांना प्रवचन देतांना अथवा वादविवाद करतांना आपल्या विद्यार्थ्यांची, श्रोता वर्गाची बौद्धिक पातळी लक्षात घेऊन त्यांच्याशी त्या पातळीवर बोलत असत. भगवान बुद्धांनी केवळ मौखिक ज्ञानाला महत्त्व दिले नाही. तर आचरणत्मक ज्ञानाला त्यांनी अधिक महत्त्वाचे मानले. 


भगवान गौतम बुद्धांची शिकविण्याची आणखीन एक अनोखी पद्धत होती. ते शोध घेऊन स्वतः शिकणे या पद्धतीचा उपयोग देखील करत.  किसा गौतमीचे उदाहरण आपण पाहू शकता. किसा गौतमीला शोध घेऊन आणि स्वतः शिकण्यास बोध घेण्यास त्यांनी प्रवृत्त केले. 


आकृती काढून किंवा चित्ररूपात विषय समजावून घेण्याची पद्धती भगवान बुद्धांच्या काळात अस्तित्वात आली. दिव्यवनात महामोग्घलायन प्रत्युत्य समुत्प्पाद शिकविताना बारा निदान (कड्या)असल्याची आकृती काढून शिकविले आहे.


शिकण्याविषयी आणि शिकविण्या विषयाची भगवान बुद्धांची मते महत्त्वाचे आहेत. सिगाल सुत्तात 

भगवान बुद्धांनी शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांचे कर्तव्य सांगितले आहेत. 


भगवान बुद्धांनी लोकांना धम्म शिकवण्याचे ठरविल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, एवढ्या मोठ्या प्रदेशातील लोकांना धम्म शिकवण्यासाठी लोकांत जाऊन त्यांच्या भाषेत धम्म समजावून सांगणारे प्रशिक्षित शिक्षक हवेत. त्यांनी त्यासाठी त्या शिक्षकांचा एक संघ त्यांनी स्थापन केला. त्या संघाचे व्यवस्थापन नीट करण्यासाठी विनयाचे नियम बनविले.

बुद्धांनी पहिल्यांदा साठ भिक्खूंना प्रशिक्षित केले. प्रशिक्षित केलेल्या त्या भिक्खूंना बहुजनांत जाऊन धम्म शिकवण्यास सांगितले.


“धम्म साकच्छा” म्हणजे धम्म विषयक चर्चा करणे. भगवान बुद्धांनी शिकवलेल्या धम्मतत्वज्ञानाचे स्पष्टीकरण करणे, मूल्यमापन करणे आणि त्याचे विश्लेषण करणे. हे एक देखील संघाचे महत्त्वाचे बौद्धिक कार्य होते. या “धम्म साकच्छा” मुळे अभिधम्मपिटकासारखे त्रिपीटकातील ग्रंथ निर्माण झाले. धम्म साकच्छा चे ठळक उदाहरण म्हणजे “मिलिंद प्रश्न” मिलिंद पन्नास भिक्खु नागसेन आणि राजा मिलिंद यांची धम्मावर झालेली चर्चा होय.


बौद्ध धम्माच्या शिक्षण पद्धतीतूनच पुढे नालंदा,विक्रमशीला,तक्षशिला,ओदांतपुरी, घोसरावा, सोमपुरी,जगद्दल इत्यादी उत्तर भारतातील आणि वल्लभी, अमरावती, कान्हेरी, अजंठा, नागार्जुनकोंडा, कांची इत्यादी दक्षिण भारतातील विश्वविद्यालय निर्माण झाली. 


भारतातील सर्वधर्मांची तुलना करता असे दिसून येते की, 

बौद्धांनी सर्वात प्रथम साक्षरतेचे महत्व जाणले इसवी सन पूर्व 84  साली बौद्धांनी सर्व त्रिपिटक लीपीबद्ध केले. छांद किंवा छांदस ही त्यावेळीची वैदिक भाषा होती. संस्कृत भाषा ही भगवान बुद्धांच्या नंतर २०० वर्षांनी पालीचे भाषांतर संस्कार करून बनवली म्हणून त्या भाषेला संस्कृत असे म्हणतात.


भारतात वैदिक ब्राह्मणी धर्माच्या आणि जैन, लोकायत वगैरे इतर धर्मांच्या विरोधाला बौद्धांना तोंड द्यावे लागले. प्रतिस्पर्तांशी वादविवाद करण्यासाठी लागणारे कौशल्य वाढवण्यासाठी आणि स्पर्धकावर मात करण्यासाठी बौद्ध शिक्षण पद्धतीत व अभ्यासक्रमात बदल होऊन धम्माशी प्रत्यक्ष संबंध नसलेले औषधोपचार शास्त्र,  खगोलशास्त्र,गणित इत्यादी लौकिक विषय सुद्धा बौद्ध शिक्षणातून शिकवले जाऊ लागले. बुद्धांनी भिक्खूंना तिथीचा जाणकार होण्यास सांगितल आहे.


बौद्ध समाजाचे मुख्य दोन विभाग आहेत. एक “संघ” आणि दुसरा “उपासक” संघ हा पुरुष व महिला भिक्खू संघाचा मिळून बनलेला असतो. हा भिक्खू संघ त्यांच्या ठाई असणाऱ्या शिक्षण, ज्ञानामुळे होय.

बुद्ध पोर्णिमा (१२ मे, २०२५) पोस्ट क्रमांक ०२

बुद्ध पोर्णिमा  (१२ मे, २०२५)    पोस्ट क्रमांक ०२

 



तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्रामुख्याने चार आर्य सत्य सांगितले. 

१. जगात दुःख आहे.

२. दुःखाला कारण आहे. 

३. ⁠दुःख निरोध तृष्णेच्या नाशातून दुःख निरोध करता येतो.

४. ⁠दुःख निरोधगामीमार्ग 


दुःख निरोधगामी मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग.

१. सम्यक दृष्टी 

२. ⁠सम्यक संकल्प 

३. ⁠सम्यक वचन 

४. ⁠सम्यक कर्म 

५. ⁠सम्यक जीविका 

६. ⁠सम्यक प्रयत्न 

७. ⁠सम्यक स्मृती 

८. ⁠सम्यक समाधी 


गाडीच्या चाकाला बारा कड्या असतात तसे दुःखाला बारा निदाने,कारण वा हेतू असतात असे बुद्ध म्हणतात.


बौद्ध धर्मातील द्वादश निदान (१२ कड्या) म्हणजेच प्रतीत्यसमुत्पादाची साखळी पुढीलप्रमाणे आहे:

१. अविद्या (अज्ञान)

२. संस्कार – कर्म आणि मानसिक

३. विज्ञान – चेतना 

४. नामरूप – शरीर आणि मन

५. षडायतन – सहा इंद्रिये 

६. स्पर्श – इंद्रिय आणि विषय

७. वेदना – (आनंद, दुःख इत्यादी)

८. तृष्णा – इच्छा किंवा आसक्ती

९. उपादान – आसक्तीला ठेवणे हाव

१०. भव– (अस्तित्व)

११. जाति – जन्म

१२. जरामरण – वार्धक्य आणि मृत्यू


ही साखळी आहे. एका मेकावर ती अवलंबून असते. हे असले की ते होते. या कार्यकारणभावालाच बुद्ध प्रतीत्य (कारण) समुत्पाद (कार्य) म्हणतात. जर आपण अविद्या (अज्ञान) नष्ट केली, तर पुढचं सगळं साखळीतून आपोआप गळून पडतं – आणि त्यामुळे दुःखाची समाप्ती होते वा निर्वाणप्राप्ती होते!


बुद्ध सर्व वस्तुमात्र अनित्य वा क्षणिक असे मानतात. तेव्हा जे अनित्य वा क्षणिक नाही ते सत्य नाही असे ते सांगतात. म्हणून त्यांच्या तत्त्वज्ञानाला  क्षणिकवाद किंवा अनित्यवाद असे देखील म्हणतात.


संदर्भ: बुद्ध भिक्खू आनंद विशाखा- शरद पाटील

बुद्ध पोर्णिमा (१२ मे, २०२५) पोस्ट क्रमांक ०१


बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोंबर, १९५६ रोजी बहुसंख्य अस्पृश्यांना नागभूमीत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित व भारतीय संविधानाला पुरक अशा बौद्ध धम्माची दीक्षा देऊन बौद्ध धम्माच्या ओटीत टाकले. त्यासोबतच धम्म आणि संविधान अशी दुतर्फा जिम्मेदारी देखील दिली. 


बाबासाहेबांच्या हयातीतच सन १९५६ साली ते सिलोन येथे गेले असता बौद्ध धम्मातील पूजा पाठ व गाथा त्यांनी संग्रहित व रेकॉर्ड करून घेतल्या होत्या.


बाबासाहेब म्हणाल्या प्रमाणे त्यांनी बायबल सदृश्य धम्म ग्रंथ १९५६ ला आपल्यासाठी लिहून देखील ठेवला. परंतु आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “दि बुद्धा अँड हिस धम्मा” या अप्रतिम ग्रंथाला वैश्विक पातळीवरील बौद्धांचा एक आदर्शभूत बायबल सारखा ग्रंथ म्हणून मान्यता मिळवू शकलो नाही आहोत. ही शोकांतिका म्हणावी लागेल.


धम्मदीक्षा दिल्यानंतर अवघ्या ५३ दिवसांत म्हणजे ०६ डिसेंबर, १९५६ रोजी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाले. अर्थातच त्यामुळे बौद्ध धम्माचा प्रचार, प्रसार व संस्कार करण्यासाठी पुरेसा वेळ त्यांना मिळाला नाही. त्यामुळे ही जबाबदारी अपसुकच ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्या नवदीक्षित व शिक्षित उपासकांवर आली. 


या नवदीक्षित आणि शिक्षित आंबेडकरी समाजाला आपण स्वीकारलेल्या नवीन जीवन मार्गाच्या संपन्नते बाबत कुतूहल, निकड व ज्ञान जालसा निर्माण होणे स्वाभाविक होते. त्यामुळे चौफेर वैचारिक घुसळणीतुन अनेक धम्म संस्कार पुस्तकांपासून ते थेट पाली त्रिपीपटकापर्यंतच्या अनुवादापर्यंत अशा अनेक अप्रतिम व उत्तम ग्रंथ संपदा व साहित्य निर्मिती झाली. 


आचार्य राहुल संस्कृत्यायन लिखित “बुद्धचर्या”, पी.एल.नरसू लिखित “इसेन्स ऑफ बुद्धिझम”, पॉल कॅरोस लिखित “दि गॉस्पेल ऑफ बुद्धा”, रा.धर्मानंद कोसंबी लिखित “बुद्धलीलासार”, पंडित कोसंबी लिखित “बुद्ध धर्म आणि संघ”, वा.गो. आपटे यांचे “बौद्ध पर्व”, केळुस्कर गुरुजींचे लिखित “भगवान बुद्धांचे चरित्र”, आचार्य बुद्धघोष लिखित अठ्ठकथा तसेच भदंत कौसल्यायन लिखित असे नानाविध साहित्य संपदा उपलब्ध झाली. 


त्यानंतरच्या टप्प्यात अनेक विद्वानांनी वेळोवेळी लेखन केले आहे. जसे पँथर राजा ढाले सर संपादित “धम्म लिपी” अंक. डॉ. गंगाधर पानतावणे सर संपादित “अस्मितादर्श” मधील समीक्षात्मक लेख असतील. एडवोकेट विमल सूर्य चिमणकर सर “दी पीपल” या मासिकातून संपादित लेख असतील असे अनेक विद्वानांनी निर्लोप लिखाण केले.


पुढील काळात बहुजनवादी,मूलनिवासीवाद,शिवधर्म व गोयंका गुरुजींचे विपश्यना असे अनेक प्रयोग देखील येथे घडले. ते कितपत हितकारक अथवा अहितकारक त्यावर अनेकांनी आपली मते मांडलीच आहेत. राज ढाले, यशवंत मनोहर व तत्सम दोन्ही बाजूचे लिखाण झाले.


बाबासाहेबांनंतर नव दीक्षित आणि शिक्षित समाज आणि त्याची सामाजिक चळवळ याची वर्तमान स्थिती ही निश्चितच काळजी करण्यासारखी आहे. काळजी करण्यासारखी जरी असली तरीही आंबेडकरी चळवळ संपलीआहे का? या बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. 


मात्र विविध महाविद्यालयातून विद्यापीठांमधून प्राध्यापक ,अभ्यासक, भिक्कू संघ, उपासक,साहित्यिक लेखक यांच्याकडून बौद्ध साहित्य,संस्कृती,लेणी, धम्माचे तत्त्वज्ञान व आंबेडकरवाद या सर्वांचा अभ्यास करून अधिक स्पष्ट नवसर्जन नवनिर्माण साहित्य, ग्रंथ निर्मिती व संस्थात्मक काम होणे अपेक्षित आहे.

बौद्ध पौर्णिमा

 



▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🌹  सुखद बुद्धांचा जन्म  🌹


सुखो बुद्धानं उप्पादो सुखा

सद्धम्मदेसना

सुखा संघस्स सामग्गी समग्गानं तपो सुखो ।

      (धम्मपद-बुद्धवग्ग)


▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬


बौद्ध धम्मात पौर्णिमेला खूप महत्व आहे,. सर्व पौर्णिमा ह्या सणासारख्या साजऱ्या झाल्या पाहिजेत. बौद्ध व्यक्तिने विहारात /घरात  सफेद वस्त्र परिधान करून त्रिरत्नांना वंदन केले पाहिजे, वंदना म्हटल्या पाहिजेत व अनुसरण केले पाहीजे.


 पौर्णिमा साजरी कशी करावी.

१. सकाळी लवकर उठून आदर्शना वंदन करून, वंदना सुत्त पठन करावे.

२. ⁠पांढरे वस्त्र परिधान करावे.

३. ⁠खीरदान करावे. 

४. ⁠भिक्कूंना घरी आमंत्रित करून धम्मदेसना घ्यावी.

५. ⁠विहारात जावे.

६. ⁠दिवसभर उपोसथचे पालन करावे.


उपोसथ म्हणजे काय?


 उपोसथ  म्हणजे उपास-तापास करणे किंवा केवळ उपाशी राहणे नव्हे. उपोसथात धम्म जीवनाच्या आठ मूलभूत शीलांचे पालन करीत आपल्यातील  सत्यतेचा  शोध घेत राहावयाचे असते. त्यातून आपल्यातील गुणदोषाचे दर्शन घ्यायचे असते आणि त्या अनुभूतीतून दोषांचे निवारण करून गुणांचे संवर्धन करायचे असते. बाह्य जगातून घडणाऱ्या कुसंस्कारांना ओळखून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा असतो. उपासक-उपासिका म्हणून सांगितलेल्या आठ सद्गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न करायचा असतो.


१. "पाणातिपाता वेरमणी                 सिक्खापदं समादियामि"।

 २."अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि"।

३."अब्रह्मचरिया वेरमणी सिक्खापदं समादियामि"।

४ " मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि"।

५." सुरामेरयमज्जपमाद्ट्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि"।

६ "विकालभोजना वेरमणी सिक्खापदं समादियामि"।

७. नच्च- गीत-वादित-विसुक-दस्सना;माला गंध विलेपन-धारण-  मंडण-विभुसनठ्ठना वेरमणी, सिक्खापदं समादियामि"।

८. "उच्चायसन- महासयाना वेरमणी सिक्खापदं समादियामि"।


 याचा अर्थ असा:

१. प्राणी हिंसा न करण्याचा शिकवणीचा मी स्वीकार करतो.

२. न  दिलेले न घेण्याचा शिकवणीचा मी स्वीकार करतो.

३. अब्रह्मचर्ये पासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.

४. असत्य बोलण्यापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.

५. सुरा, मेरय, मद्य वगैरे प्रकारच्या मद्यपानापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.

६. अकाली भोजन करण्यापासून अलिप्त राहण्याच्या शिकवण्याचा मी स्वीकार करतो.

७. नाचगाणे संगीत नाट्य तसेच हार-तुरे घालणे,गंध लावणे, श्रृंगार करणे, अलंकार घालणे, यापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.

८ ऐषारामी गाद्या गिरदयांचा  वापर करण्यापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.


दुपारी १२ च्या आत जेवण ग्रहन करावे आणि त्या नंतर दिवसभर काही खाऊ नये त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर अन्न ग्रहण करावे .अश्या रीतीने पंचशील, अष्टशील यांचे पालन करत उपोसथ ग्रहण करावे.


भवतु सब्ब मंगलम !!


तथागत भगवान गौतम बुद्धांच्या २५८७ व्या जयंती निमित्ताने सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

कुटुंब दिन

 


दमा, अस्थमा, मधुमेह असो की उच्चरक्तदाब या सारख्या आजारांना बळी पडण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये महिलांपेक्षा अधिक आहे. या आजाराने मृत्यू पावण्याचे देखील प्रमाण अधिक आहे. स्त्रियांच्या तुलनेत मानसिक आजार देखील पुरुषांमध्ये अधिक आहेत. साधारण आयुर्मान देखील स्त्रियांहून पुरुषांचे कमी आहे. अकाली वृद्धत्व पुरुषांमध्ये अधिक आहे. अपघाती मृत्यूत देखील पुरुष पुढे आहेत. आत्महत्या मग तो शेतकरी असो की नोकरदार त्यात देखील पुरुषांची संख्या जास्त आहे.


या सर्वांच प्रमुख कारण आहे. जबाबदारी… जबाबदारी मग ती कौटुंबिक, सामाजिक व पुरुष प्रधान संस्कृतीने दिलेलीही असेल. या जबाबदाऱ्यांतून येणारा मानसिक- शारीरिक ताण. त्या जबाबदारी व बाजारी गरजा पूर्ण करण्यासाठी सतत घराबाहेर राहून केलेली ओढाताण. घराबाहेर राहून आहार-विहार यामुळे होणारे शारीरिक परिणाम . कुटुंबापासून आपसूकच वेळ व संपर्क नसल्यामुळे तुटल्यागेल्याची भावना व चिंता.


पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांना परावलंबी, दीन व शोषित बनवले असेल तर पुरुषाला शोषक बनवून व्हिलन तर केलेच आहे. परंतु संस्कृतीच्या या काटेरी मुकुटात त्याचेही सामूहिक शोषण झाले आहे . त्यामध्ये त्याला यंत्रमानव बनवून त्याचेही माणूसपण हिरावून घेतले आहे. जीवनाच्या रहाटगाड्यात त्याला सतत जुंपून ठेवण्याचे काम येथील सिस्टीमने केले आहे. एवढे करूनही त्याला सामाजिक- कौटुंबिक स्थैर्य, प्रेमभाव त्याच्या वाट्याला येईलच याची खात्री नसते. किंबहुना अनेकदा त्याला समाज कवी लेखक व कुटुंबीयही घराचा खांब, पाषाण हृदयी समजून तुसड्या सारखी वागणूक देतात. बापाची आणि क्रेडिटकार्डची गरजेपुरता आठवण.


पुरुष सतत ढाल बनून पुढे राहण्याच्या स्पर्धेत..तो आपसूक जन्मताच ढकलला जातो आणि आयुष्यभर ऊसाच्या त्या चरख्यात पिळून टाकला जातो.


त्याला थकायची, थांबायची आणि रडायची मुभा आणि उसंत नसते. कारण तो थकला की बिनकामी. तो थांबला तर रिकाम टेकडा. रडला तर बाईल्या होतो. 


स्त्रियांना झुकते माप देणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे कायदे आहेत. पुरुषांनीच निर्माण केलेले हे पुरुषी जग आहे. जे शोषणावर व जीवघेण्या स्पर्धेवर चालते. या भांडवली युगाने स्त्रियांना देखील पुरुषी मानसिकता,वागणूक,अहंकार व संस्कार-सोपस्कार दिला आहे व केला आहे. इथल्या स्त्रीवादी चळवळी स्त्रियांना पुरुष बनवण्यात चळवळ मानतात तो वेगळाच विषय.

Tuesday, 7 January 2025

कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर



०५ जानेवारीस नालंदा शाखेच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरातील मनोगत मांडले ते पुढील प्रमाणे.


बुद्धांनी वज्जींना केलेला संदेश आपणास ज्ञात आहे .


हत्तीस आवरी गवती दोर ।

मुंग्या हि सर्पासी करिती जर्जर। व्याघ्रसिंहसी फाडीती हुशार। 

रानकुत्रे संघटोनी। 

तुकडोजींच्या या कवनांची महती देखील आपण जाणता.


लक्षात घ्या. या देशात विषमता आहे. या विषमतेचे कारण केवळ आर्थिक नसून सामाजिक आहेत. जन्मासोबत जात नावाच लेबल चिटकवून व्यक्तीची प्रतिष्ठा, ओळख, कला-गुण, सामाजिक ओळख, संसाधनांची उपलब्धता यांना एक मर्यादेचे बंधन जन्मभर बांधले जाते.


ही विषमता व ठेकेदारी मोडीत काढण्यासाठी सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक,आर्थिक व राजकीय मुठभरांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी. स्वतंत्र्य, समता, बंधूत व न्यायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी संघटनेची गरज भासते.


कारण तुम्ही व्यक्तीशी लढत नसून सिस्टीम सोबत लढत आहात. केवळ लढत नसून एक पर्यायी सिस्टीम उभी करू इच्छिता. त्यामुळे हा लढा सर्व अंगानी विषमतावादी, सरंजामी, जातीयवादी विचारांच्या, व्यक्तींच्या व संघटनेच्या विरोधात आहे.


लक्षात घ्या. तेथे व्यक्तीची मुक्ती किंवा आर्थिक उद्धार शक्य आहे. तुम्ही विषमतावादी टोळक्यात जाऊन त्यांच्या अजिंड्याखाली माना डोलवू शकता. परंतु त्याने समाजाची अथवा सामूहिक मुक्ती शक्य नाही. किंबहुना विषमता वादी शक्ती तुमचा वापर संपला की तुम्हाला देखील कचऱ्याप्रमाणे फेकून देतील.


या क्रांती प्रतिक्रांतीच्या लढ्यात स्वतःला जन्माने उच्चभ्रू समजणारा समाज कायम संघटित,शिक्षित व पर्यायाने सत्तेशी सलगी करत आपले प्रस्थ कायम ठेवण्यात यशस्वी झाला आहे. सत्तेशी सलगी त्यांनी इंग्रजांच्या  काळात केली. मुस्लिम साम्राज्याच्या काळात केली. स्वातंत्र्यानंतर देखील सत्तेत राहुल मलिदा खाण्याचे व बहुजनांचा मलिदा करण्याचे काम अथक अविरत सुरू आहे.


त्यांच्या या यशाचे गमक हा त्यांचं शिक्षण, संघटन, अजिंडा व लबाडी हे आहे. या सगळ्याचा वापर ते विषमतावादी व्यवस्था टिकवण्यासाठी करतात.


या सिस्टिमला पर्याय आपण शिक्षित संघटित व जागृत होऊन आपल्या अजिंड्यावर काम करून दिला पाहिजे.


तत्पूर्वी हे समजून घ्या की, सिद्धार्थ बुद्ध झाले व त्यानंतर त्यांच्या हातून ४५ वर्ष परिवर्तनाचे कार्य झाले. बोधिसत्व बाबासाहेबांनी संपूर्ण जीवन समाजाच्या उद्धारासाठी दिले. जे जे प्रबुद्ध झाले बोधी झाले त्यांनी परिवर्तनाची कास पकडली.


कार्यकर्त्याने त्यासाठी पंचशिलाचे व शिलमार्गाचे महत्व जाणले पाहिजे. शील समाधी प्रज्ञा न जाणता. पंचशील न अंगीकारता काम करणारे कार्यकर्ते अनेकदा भरकटण्याचे व चळवळीला वेगळ्या दिशेला नेण्याचे काम जाणते अजाणते करू शकतात.  त्यामुळे चळवळीत झांगडगुत्ता, संभ्रम देखील झाले. हेही लक्षात घ्या. जातीसंस्थेचे निर्मूलन करा. जातीभेद, धर्मभेद यांना तितकेसे महत्व नाही. शिक्षण व आर्थीक सबलीकरण करा.


धन्यवाद 🙏

Sunday, 29 December 2024

कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृतिदिन

 



नाशिकच्या १२ किलोमीटर आणि उत्तरेस आंबे दिंडोरी नावाच गाव आहे.  येथेच लोकनेते पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा जन्म 15 ऑक्टोंबर 1902 रोजी पवळाबाई यांच्या पोटी झाला. त्याच मुलाचे नाव किसन भाऊंनी भाऊराव असे ठेवले.


०१ जानेवारी 1927 रोजी कोरेगाव जिल्हा पुणे येथील विजय स्तंभावर झालेल्या सभेत भाषण करून दादासाहेब गायकवाड यांनी आपले नाव प्रथम महाड येथील सत्याग्रहात भाग घेण्यासाठी नोंदवली होते आणि बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात त्यांचे नाव एक सत्याग्रही म्हणून नोंदवली होते. त्या सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते.


20 मार्च, 1927 परिषदेच्या शेवटी जो हल्ला होता. त्याची सर्व इथंबूत माहिती नावांनीशी गोळा केली आणि निरपराराध अस्पृश्यांवर एकदम हल्ला करणाऱ्या गुंडाविरुद्ध कोर्टात खटले भरले गेले चार- पाच महिन्यांनी त्या खटल्याचा निकाल लागून सात-आठ गुंड मोरक्यांना प्रत्येकी चार महिन्यांची सश्रम करावासाची शिक्षा देखील झाली. यासगळ्यात दादासाहेबांनी काम केले होते.


इसवी सन 1930 साल उजाडले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी 2 मार्च, 1930 रोजी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची रणशिंग फुंकले. 


रविवारी 13 ऑक्टोबर, 1935 रोजी येवला येथील परिषद भरली. अस्पृश्य समाजातील सुमारे 50 हजार लोक त्या परिषदेला हजर होते. या परिषदेचा प्रचार करताना दादासाहेब आपल्या सहकाऱ्यांसह कधी पाई कधी सायकलवर तर क्वचित मोटरने प्रवास करीत.


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन. दादासाहेब गायकवाड यांना  16605 मते 25 फेब्रुवारी 1937 रोजी पडली व त्यांचा विजय झाला.


14 एप्रिल 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 45 वा वाढदिवस येवला येथे मोठी जाहीर 

परिषद घेऊन साजरा करण्यात आला या परिषदेत दादासाहेबांचे बाबासाहेबांनी अभिनंदन केले.


बाबासाहेबांच्या पश्चात  बाबासाहेबांच्या शवाला साक्ष ठेवून दिनांक 7 डिसेंबर, 1956 रोजी चैत्यभूमीवरच 25 लाख अनुयायांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने बौद्ध धर्माची दीक्षा भदंत आनंद कौशल्यन यांनी त्रिशरण पंचशीलाच्या उच्चाराने दिली.


1957 च्या सार्वजनिक निवडणुकीत शेकाफ हे पक्षाला चांगले यश मिळाले त्यात 21 आमदार आणि 11 खासदार निवडून आले.


दिनांक 3 ऑक्टोबर 1957 रोजी पक्ष स्थापन करण्यासाठी देशाच्या विभागातून नेते कडे नागपूरला एकत्र आले होते. त्याच दिवशी या पक्षाची  स्थापना झाली. अध्यक्ष रावबहाद्दूर एन  शिवराज, जनरल सेक्रेटरी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे व सदस्य दादासाहेब गायकवाड, बी सी कांबळे इत्यादी होते.


खासदार बी.सी कांबळे यांनी 14 मे, 1959 रोजी नागपूर येथे पक्षाचे अधिवेशन भरवले आणि तेथेच त्या दिवशी आपला दुरुस्त गट स्थापन केला व त्याला दुरुस्त रिपब्लिकन पक्ष कांबळे गट म्हणण्यात येऊ लागले.


6 डिसेंबर, 1964 ला देशव्यापी भूमीहीनांचा सत्याग्रह कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. हा सत्याग्रह एवढा प्रचंड होता की दोन महिन्यात संबंध भारतातून तीन लाख 40 हजार सत्याग्रही तुरुंगात गेले त्यात सर्व जाती-जमातींची भूमिहीन शेतकरी होते.


दादासाहेब गायकवाड  पंधरा वर्षे खासदार होते आपल्या भाषणातून त्यांनी पार्लमेंट गाजवली होती. 29 डिसेंबर, 1971 चा तो काळा दिवस ठरला त्याच दिवशी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी जगाचा निरोप घेतला.


यांच्या कार्यास आणी त्यागास विनम्र अभिवादन..!💐🙏

Sunday, 22 December 2024

भारतीय संविधान

 



भारतीय संविधान

भाग क्रमांक ३


2.मॉन्टेग्यू-चेल्मसफर्ड समिती (1917)

ब्रिटिश सरकारने भारतातील सामाजिक आणि राजकीय सुधारणा करण्यासाठी स्थापन केलेली एक महत्त्वाची समिती होती.


स्थापना:

मॉन्टेग्यू-चेल्मसफर्ड समिती स्थापन करण्याची घोषणा 1917 मध्ये केली गेली होती. या समितीचे नेतृत्व लॉर्ड मॉन्टेग्यू (ब्रिटिश सचिव, India Secretary) आणि सर हेनरी चेल्मसफर्ड (गव्हर्नर जनरल) यांनी केले.


उद्दीष्ट:


भारतातील प्रशासन सुधारणा करणे.

भारतीय लोकांना अधिक स्वायत्तता देणे.

भारताच्या विधानमंडळात भारतीयांच्या प्रतिनिधित्वाला वाव देणे.

मुख्य शिफारसी:


प्रांतिक स्वायत्तता: प्रांतातील शासनाचा भाग भारतीयांच्या हाती देणे, ज्यामुळे भारतीय प्रांत सरकारांत अधिक स्वायत्तता होती.

केंद्रीय विधान मंडळातील सुधारणा: भारतीय प्रतिनिधींची संख्या वाढविणे आणि शासकीय कार्यांमध्ये अधिक भारतीय सदस्यांचा समावेश करणे.

गव्हर्नर जनरलची भूमिका: ब्रिटिश गव्हर्नर जनरलला केंद्रीय शासक म्हणून कायम ठेवले, पण प्रांत सरकारांना अधिक अधिकार देण्याचा प्रस्ताव ठेवला.

परिणाम:

या शिफारसींचा परिणाम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट, 1919 मध्ये झाला, ज्यामुळे ड्यूल सिस्टम (ड्यूल कंट्रोल) सुरू झाला आणि प्रांतिक स्वायत्तता मिळविण्यास सुरवात झाली.



भारताच्या नगरपालिका निवडणुका:

भारतातील नगरपालिका निवडणुका स्थानिक शासन आणि प्रतिनिधित्वाच्या वाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. मुंबई आणि कोलकाता अशा शहरे, जे ब्रिटिश सरकारच्या मुख्य अधिकार क्षेत्रात होती, त्यात नगरपालिका निवडणुका घेतल्या गेल्या.

संदर्भ: "Municipal Governance in British India" by S. S. Oza, published by India Book House.

प्रांतिक विधानसभा स्थापन:

प्रांतिक विधानसभा स्थापन 1919 नंतर सुरु झाल्या. याचा परिणाम म्हणून, भारतीय जनतेला शहरी आणि ग्रामीण भागात सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली.

संदर्भ: "Constitutional Development in India" by Bipan Chandra, published by Har Anand Publications.

वरील संदर्भामध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताच्या राज्यघटना, ब्रिटिश सुधारणा, आणि प्रांतिक विधानसभा आणि नगरपालिका सुधारणा यांचे सखोल वर्णन केले गेले आहे. हे दस्तऐवज आणि ग्रंथ भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरतात.


ब्रिटिश राजवटीत भारतीय प्रशासनातील स्थानिक सहभाग आणि स्वराज्याची प्रक्रिया सुरुवात करण्यासाठी नगरपालिका निवडणुका आणि प्रांतिक विधानसभा स्थापन करण्यात आले. हे टप्पे भारतीय स्वातंत्र्य संघर्षाच्या महत्त्वाच्या प्रक्रियेचे भाग होते. खाली यांची तपशीलवार माहिती आणि त्याचे महत्त्वपूर्ण उदाहरणे दिली आहेत.

1. नगरपालिका निवडणुका

भारतात नगरपालिका निवडणुका सुरू होण्याच्या पंढरीत 19व्या शतकाच्या अखेरीस सुधारणा केली गेली. काही महत्त्वाच्या नगरपालिका निवडणुका आणि सुधारणा पुढील प्रमाणे आहेत:

i) कोलकाता नगरपालिका निवडणुका (1899)

कोलकाता (पूर्वीचे कलकत्ता) नगरपालिका निवडणुका ब्रिटिश काळातील सर्वात महत्त्वाच्या नगरपालिका निवडणुकांपैकी एक होत्या.

1899 मध्ये कोलकाता नगर निगमच्या निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये भारतीयांना स्थानिक प्रशासनामध्ये थोड्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले. या निवडणुकांमध्ये भारतीय नागरिकांचा सहभाग आणि त्यांचे अधिकार मर्यादित होते.

ii) मुंबई नगरपालिका निवडणुका (1872)

मुंबईमध्ये नगरपालिका निवडणुका 1872 मध्ये घेण्यात आल्या. त्यावेळी भारतीय नागरिकांना निवडणुकीत थोडक्यात प्रतिनिधित्व दिले होते, पण पूर्ण अधिकार मात्र ब्रिटिशांनी ठेवले होते.

iii) अहमदाबाद नगरपालिका निवडणुका (1917)

1917 मध्ये अहमदाबादमध्ये नगरपालिका निवडणुका घेण्यात आल्या, ज्यात भारतीय नागरिकांचा सहभाग वाढला. यामध्ये भारतीय लोकांना अधिक प्रतिनिधित्व दिले गेले.

2. प्रांतिक विधानसभा स्थापनेची प्रक्रिया

भारतातील प्रांतिक विधानसभा हे राज्यस्तरीय स्वायत्त शासन स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण कदम होते. 1919 च्या विझिंटन योजना आणि गोलमेज परिषद यामध्ये भारतात प्रांतिक विधानसभा स्थापन करण्याची प्रक्रिया अधिक प्रगल्भ झाली.

i) मद्रास प्रांतिक विधानसभा (1920)

मद्रास (आता चेन्नई) प्रांतामध्ये 1920 मध्ये प्रांतिक विधानसभा स्थापनेसाठी महत्त्वाची सुधारणा झाली.

यामध्ये भारतीय जनतेला राज्यस्तरीय विधायी कामकाजात थोडेफार स्वातंत्र्य मिळाले आणि विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. यात भारतीय नागरिकांना निश्चित प्रतिनिधित्व मिळाले.

ii) बंगाल प्रांतिक विधानसभा (1921)

बंगाल प्रांतातील प्रांतिक विधानसभा स्थापन 1921 मध्ये करण्यात आली. यामध्ये भारतीयांना राज्यस्तरीय प्रशासनाच्या प्रक्रियेत भाग घेण्याची संधी मिळाली.

iii) उत्तर प्रदेश प्रांतिक विधानसभा (1937)

1937 मध्ये उत्तर प्रदेश (आता उत्तर प्रदेश) राज्यातील प्रांतिक विधानसभा स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण सुधारणा केली गेली.

यामध्ये प्रांतिक विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या, आणि भारतीय जनतेला राज्यस्तरीय सरकारात अधिक प्रतिनिधित्व मिळाले.

iv) पंजाब प्रांतिक विधानसभा (1937)

पंजाब प्रांतातील प्रांतिक विधानसभा 1937 मध्ये स्थापन करण्यात आली. यामध्ये भारतीयांना अधिक अधिकार आणि प्रतिनिधित्व मिळाले.


संदर्भ:


"Indian Constitutional History" by Dr. Durga Das Basu

"The Making of Modern India" by Sumit Sarkar


3.सायमन कमिशन - 1927:

स्थापना:


सायमन कमिशन स्थापन करण्याची घोषणा 1927 मध्ये ब्रिटिश सरकार ने केली. या कमिशनचे नेतृत्व सर जॉन सायमन यांनी केले. त्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली.

उद्दीष्ट:


भारताच्या संविधानिक सुधारणा बाबत अंतिम शिफारसीं सादर करणे.

भारतीय शासन व्यवस्थेतील सुधारणा सुचवणे आणि ब्रिटिश नियंत्रणातील स्वायत्तता कशी वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन करणे.

महत्त्वाचे मुद्दे:


भारतीय शासकीय संरचनेत सुधारणा करणे.

भारतीय विधानसभेचे स्वरूप बदलणे.

भारतीय राजकीय नेत्यांना अधिक अधिकार देणे.

विरोध:


सर्वांत मोठा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे, सायमन कमिशन मध्ये एकाही भारतीय सदस्याचा समावेश नव्हता. त्यामुळे भारतीय जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इतर सर्व प्रमुख भारतीय संघटनांनी या समितीचा तीव्र विरोध केला. त्यांना त्यांच्याशी संबंधित असलेल्या अधिकारांवर चर्चा करण्याची संधी न दिल्याने भारतीय जनतेत "सायमन गो बॅक" (Simon Go Back) चा नारा देऊन विरोध करण्यात आला.

भारतातील प्रतिक्रिया:


सायकल विरोध: सायमन कमिशनच्या विरोधात भारतभर जवळपास सर्व प्रमुख राजकीय नेत्यांनी आंदोलन केले. विशेषतः काँग्रेस आणि मुस्लिम लीगने तीव्र निषेध केला.

राष्ट्रीय आंदोलन: भारतीय लोकांनी यावर "सायमन गो बॅक" चा नारा दिला. प्रमुख नेत्यांमध्ये लालाजी, सरदार पटेल, नेहरू यांनी याचे विरोध केले.

दांडी मार्च (Salt March) च्या आधी भारतातील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देण्यास तयार होती.

सायमन कमिशनच्या शिफारसी:


भारताचे राजकीय स्वरूप सुधारण्यासाठी काही महत्त्वपूर्ण शिफारसी करण्यात आल्या. त्यात संपूर्ण भारताच्या संविधानिक सुधारणा संदर्भात चर्चेसाठी काही शिफारसी दिल्या होत्या, पण त्या शिफारसींना भारतीय पक्षांनी विरोध केला.

भारतीय लोकांचे राजकीय अधिकार अधिक वाढविणे, आणि भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग अधिक खोलवर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले.

रिझर्व्ह सीट्स व ब्रिटिश प्रशासनातील सुधारणा कशा करायच्या यावर तत्त्वज्ञान व विचार मांडले.

परिणाम:


सायमन कमिशनच्या शिफारसींनी भारतातील राजकीय प्रक्रियेत अनेक सुधारणांची माहिती दिली, पण या कमिशनने भारतीय नागरिकांशी चर्चा न केल्यामुळे त्या शिफारसींना पूर्णपणे स्वीकारले गेले नाही.

परिणाम:

सायमन कमिशनच्या शिफारसींना भारतीय राजकीय नेत्यांनी नाकारले, आणि नेहरू रिपोर्ट (1928) तयार करण्यात आले ज्यात भारतीय लोकांच्या अधिकारांची अधिक मागणी केली गेली.

संदर्भ:


"The History of Modern India" by Sumit Sarkar

"The Indian National Congress and the Struggle for Independence" by B.R. Nanda


 4.नेहरू रिपोर्ट (1928)

नेहरू रिपोर्ट (1928) हा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज होता, ज्यात भारतीय राजकीय अधिकारांचा अधिक विस्तार करण्याचा प्रस्ताव होता.

या रिपोर्टमध्ये भारतीय संघराज्याच्या संरचनेवर विचार केला गेला आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्याची स्वीकृती दिली.


5. गोलमेज परिषद – पहिली (1930-1931)

गोलमेज परिषद (Round Table Conference) हे भारतातील संविधानिक सुधारणा वर चर्चा करण्यासाठी ब्रिटिश सरकारने आयोजित केलेली एक महत्त्वाची बैठक होती.

स्थापना:

पहिली गोलमेज परिषद 1930 मध्ये लंडनमध्ये आयोजित करण्यात आली. यामध्ये भारतातील प्रमुख नेत्यांचा समावेश होता.

उद्दीष्ट:

भारतीय संविधान सुधारणा करणे.

भारतीय लोकांच्या अधिकारांचा विचार करणे.

स्वातंत्र्याच्या मार्गावर चर्चा करणे.

मुख्य मुद्दे:

भारतीय सशक्त लोकशाहीचे धोरण.

जातीप्रथा, अल्पसंख्यांकांचे हक्क इत्यादी मुद्द्यांवर चर्चा.

हिंदू-मुस्लिम एकता व पाकिस्तानच्या मागणी संदर्भात मुद्दे उपस्थित केले गेले.

परिणाम:

पहिल्या गोलमेज परिषदेत एकदाही ठोस सहमती झाली नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्यात भाग घेतला, पण जास्त काही निर्णय घेता आले नाहीत.

संदर्भ:

"India's Freedom Struggle" by Bipin Chandra

"History of British India" by James Mill


6. गोलमेज परिषद – दुसरी (1931)

दुसरी गोलमेज परिषद 1931 मध्ये लंडनमध्ये आयोजित केली गेली. या परिषदेत भारताच्या भविष्यावर सखोल चर्चा करण्यात आली.

स्थापना:

दुसरी गोलमेज परिषद 1931 मध्ये आयोजित केली गेली.

उद्दीष्ट:

भारतीय संविधान सुधारणा.

काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्या सहभागाने भारताच्या भविष्यविषयक धोरण ठरवणे.

मुख्य मुद्दे:

स्वतंत्रता प्राप्तीसाठी धोरणे.

सामाजिक आणि धार्मिक समतेचे सिद्धांत.

पाकिस्तानच्या मागणी आणि हिंदू-मुस्लिम संघर्ष.

परिणाम:

या परिषदेतही एक ठोस निर्णय निघाला नाही, आणि गांधी-इरविन करार काढण्यात आला.

संदर्भ:

"The Making of Modern India" by Sumit Sarkar

"The Round Table Conferences" by R.K. Gupta

निष्कर्ष:

या सर्व समित्यांमुळे भारताच्या संविधानिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. प्रत्येक समितीने भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या आणि भारतीय लोकशाहीच्या पुढाकारासाठी मार्गदर्शन केले. सायमन कमिशनच्या विरोधात "सायमन गो बैक" चा नारा, कैबिनेट मिशनने भारताचे विभाजन स्वीकारले आणि गोलमेज परिषदने भारतीय राजकारणावर एक ऐतिहासिक प्रभाव टाकला.

संदर्भ:

"Modern India" by Bipin Chandra

"The Making of the Indian


7. क्रिप्स मिशन (1942)

क्रिप्स मिशन 1942 मध्ये भारतात आले आणि त्याचा उद्दीष्ट भारतीय पक्षांसोबत स्वातंत्र्याबाबत चर्चा करणे होते.

स्थापना:

ब्रिटिश सरकारने मार्च 1942 मध्ये सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली भारतात एक मिशन पाठवले.

उद्दीष्ट:

भारतीय स्वातंत्र्याच्या संदर्भात चर्चा करणे.

युद्धासाठी सहयोग मिळविणे आणि भारतीय लोकांसाठी अधिक स्वायत्तता प्राप्त करणे.

मुख्य शिफारसी:

भारताला स्वातंत्र्य देणे.

स्वतंत्र भारतातील संविधान तयार करण्यासाठी भारतीय संविधान सभा स्थापन करणे.

मुस्लिम लीगला स्वतंत्र पाकिस्तानचा प्रस्ताव दिला.

परिणाम:

क्रिप्स मिशन अपयशी ठरले कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्याचा विरोध केला, आणि मुस्लिम लीगने पाकिस्तानसाठी आपली मागणी पुनः उचलली.

संदर्भ:

"The Cripps Mission to India" by Rajiv Awasthi

"The History of India" by K.K. Aziz


8. कैबिनेट मिशन (1946)

कैबिनेट मिशन हे ब्रिटिश सरकारचे एक महत्वाचे मिशन होते, ज्यामध्ये भारतीय राजकीय पक्षांमध्ये एका सहमतीवर येण्याचे उद्दीष्ट होते.

स्थापना:

मार्च 1946 मध्ये ब्रिटिश सरकार ने कैबिनेट मिशन भारतात पाठवले. या मिशनचे नेतृत्व लॉर्ड पैट्रिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए. व्ही. अलेक्झांडर यांनी केले.

उद्दीष्ट:

भारतीय संविधानावर सहमती निर्माण करणे.

भारतात एक संविधान सभा स्थापन करणे.

भारतीय पक्षांना एकत्र आणणे आणि स्वायत्ततेच्या संदर्भात चर्चा करणे.

मुख्य शिफारसी:

संविधान सभा स्थापन करणे: भारतीय संविधान तयार करण्यासाठी संविधान सभा स्थापन करणे.

केंद्रीय सरकारचे स्वरूप: भारताला संघीय स्वरूप देणे, ज्यामध्ये राज्यांना अधिक स्वायत्तता मिळेल.

मुस्लिम लीगची मागणी: मुस्लिम लीगला पाकिस्तान साठी स्वतंत्र राज्याचा हक्क मान्य करण्यात आला.

परिणाम:

कैबिनेट मिशनच्या शिफारसींनुसार, संविधान सभा स्थापन झाली आणि भारताचे विभाजन स्वीकारण्यात आले.

संदर्भ:

"The Making of the Constitution of India" by Shyam Nandan Sinha

"India's Struggle for Independence" by Subhas Chandra Bose

भारतीय संविधान

भारतीय संविधान

 

भारतीय संविधान



भाग 02 

ज्यांना संविधानातील कायदेशीर बारकावे समजून घ्यायचे आहेत. Check andha Balance समजून घ्यावयाचे आहे. त्यांनी खालील न्यायालयीन खटले अभ्यासावे.

१. शंकरी प्रसाद देव विरुद्ध भारत संघ १९५१, सज्जनसिंग १९६५,गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य १९६७, केशवानन्द भारती विरुद्ध केरळ राज्य १९७३,मीनर्वा मिल्स विरुद्ध भारत संघ १९८०, वामनराव १९८१

 (१३,१४,३६८, DPSP,९th Amd)


२. चंपकम दोरैराजन १९५१, इंद्रा सहानी १९९३ (आरक्षण )


३. ⁠शाहबानो बेगम १९८५ (Power politics पोटगी )


———————————-

सविधान समजून घेण्यासाठी काय वाचावे / अभ्यासावे.

१. भारतीय संविधान 

२. ⁠Constitutional assembly debates official report.

३. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील तीन भाषणे.

i. १७ डिसेंबर,१९४६ भाषण 

ii. ०४ नोव्हेंबर, १९४८ भाषण 

iii. २५ नोव्हेंबर, १९४९ भाषण 

४. States and Minorities - डॉ. बाबासाहेब 

५. या जागा राखीव आहेत- अभिनव चंद्रचूड 

६. ⁠ संविधान सभेतील वादविवाद- प्रदीप गायकवाड 

७. The framing of India’s constitution- B Shivrao

८. ⁠भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवहार-डॉ वी मा बाचल

९. भारतीय राज्यघटना भारताची कोनशीला - अनूवाद भारती केळकर


भारतीय संविधानाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये. 📕


☸️ लिखित संविधान: भारतीय संविधान हा जगातील सर्वात लांब आणि सुस्पष्ट लिखित संविधान आहे. यामध्ये २५ भाग, ४४८ कलमे, आणि १२ अनुसूची आहेत.


☸️संविधानिक साधारण तत्त्वे: भारतीय संविधानाने भारताची संसदीय पद्धतीची व्यवस्था, लोकशाही मूल्ये, कायद्याचा शासन (Rule of Law), घटकिय अधिकार, आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था यांचे आधारभूत तत्त्वे निश्चित केली आहेत.


☸️पार्लमेंटरी प्रणाली: भारतीय संविधानानुसार, भारतातील सरकार संसदीय पद्धतीवर आधारीत आहे . याचा अर्थ म्हणजे सरकारला जनतेच्या प्रतिनिधींमार्फत, म्हणजे संसदेतून वैधता प्राप्त होते.


☸️सर्वधिकार समता: संविधान प्रत्येक भारतीय नागरिकाला मूलभूत अधिकार देतो. या अधिकारांमध्ये जीवन व स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, आणि बोलण्याचा व विचारांचा स्वातंत्र्याचा अधिकार यांचा समावेश आहे.


☸️ संघ राज्य प्रणाली: भारत हे एक संघीय देश आहे, म्हणजेच देशाच्या राज्यांमध्ये काही अधिकारांचे विभाजन केले गेले आहे. संविधानानुसार, केंद्र सरकार व राज्य सरकार यांना वेगवेगळे अधिकार दिले गेले आहेत.


☸️ सामाजिक व आर्थिक न्याय: भारतीय संविधान त्याच्या उद्देशानुसार समाजातील प्रत्येक वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. विशेषत: मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, आणि स्त्रिया यांना विशेष संरक्षण दिले आहे.


☸️ धर्मनिरपेक्षता: भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे, म्हणजेच कोणत्याही धर्माची सरकारी पक्षपाती भूमिका नाही. सरकारचा कुठलाही धर्म नाही. सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते.


ब्रिटिश भारतात आले, त्याचा इतिहास आणि भारतातील विविध प्रदेशांच्या जिंकण्याची प्रक्रिया एक दीर्घकाळ चाललेली होती.



1. ब्रिटिशांचे भारतात आगमन (1600): ईस्ट इंडिया कंपनीचा प्रवेश

1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्याची संधी मिळाली. हा ब्रिटिश साम्राज्याच्या भारतीय उपखंडावर प्रवेशाचा प्रारंभ होता. कंपनीने सुरुवातीला हूगली (बंगाल) मध्ये व्यापारिक ठाणे स्थापले.

ब्रिटिशांनी भारतात व्यापाराच्या हक्कासाठी विजयवाडा, चीनाई, कोलकाता, आणि मुंबईमध्ये वसाहती स्थापन केल्या.

संदर्भ:

"The East India Company: A History" by T. J. Staley

"The British Empire: A Very Short Introduction" by Ashley Jackson


2. बंगालवरील ब्रिटिश वर्चस्व (1757): प्लासीची लढाई

1757 मध्ये प्लासीच्या लढाईत रॉबर्ट क्लाइवच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सिराज-उद-दौला, बंगालच्या नवाबविरुद्ध विजय मिळवला. यामुळे बंगालवर ब्रिटिशांचा कब्जा झाला आणि भारतातील समृद्ध प्रदेशांपैकी एक असलेल्या बंगालाचा व्यापार व संसाधनांवर ब्रिटिशांचे नियंत्रण प्रस्थापित झाले.

या लढाईचा परिणाम म्हणून बंगाल आणि त्याच्या आस-पासच्या प्रदेशांचा ताबा ब्रिटिशांनी घेतला, ज्यामुळे भारताच्या इतर प्रदेशांमध्ये त्यांच्या वर्चस्वाची नांदी झाली.

संदर्भ:

"The Battle of Plassey" by K. K. Aziz

"The History of Bengal" by Sir Jadunath Sarkar


3. मराठा साम्राज्याचे वर्चस्व आणि संघर्ष (1760-1818)

मराठा साम्राज्याने 18व्या शतकाच्या सुरुवातीस भारताच्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळवले. ब्रिटिशांनी मराठा साम्राज्याच्या विरोधात लढायला सुरुवात केली, आणि सातवट राजवंशाचे नेतृत्व करून ब्रिटिशांनी पेशवे युद्ध लढले.

दुसरे मराठा युद्ध (1805) आणि तीसरे मराठा युद्ध (1817-1818) मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांना पराभूत केले. यामुळे पुणे, सातारा आणि इतर मराठा प्रमुख प्रदेशांचा ताबा ब्रिटिशांनी घेतला.

सांगली युद्ध (1799) मध्ये ब्रिटिशांनी टीपू सुलतान याच्या विरुद्ध लढाई जिंकली आणि त्याच्या साम्राज्याचा ताबा घेतला. यानंतर, दक्षिण भारतातील राज्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली.

संदर्भ:

"The Maratha Empire" by James Grant Duff

"The Marathas 1600–1818" by T. S. Shejwalkar


4. सिख साम्राज्याचा पराभव (1845-1849)

सिख साम्राज्य (जे रंजीत सिंग यांनी स्थापले होते) ब्रिटिशांसमोर एक मोठा अडथळा बनले होते. 1845 मध्ये सिख साम्राज्य विरुद्ध ब्रिटिशांच्या सिख युद्ध सुरू झाले.

दुसरे सिख युद्ध (1848-1849) मध्ये ब्रिटिशांनी सिख साम्राज्य पराभूत केले आणि पंजाबचा ताबा घेतला, ज्यामुळे पंजाब, चंडीगड, आणि अन्य सिख वस्ती असलेले प्रदेश ब्रिटिश साम्राज्यात समाविष्ट झाले.

संदर्भ:

"The Sikh Empire" by M. S. Ghurye

"The Punjab and the Raj" by J. S. Grewal


5. उत्तर भारताचा विस्तार (17व्या शतकाच्या शेवटी)

मुघल साम्राज्यचा प्रभाव 17व्या शतकाच्या उत्तरार्धात घटलेला होता. ब्रिटिशांनी मुघल सम्राटाच्या कुप्रभावाचा फायदा घेतला आणि त्यांच्या नावे कर्नाटका, बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश इत्यादी प्रमुख प्रदेशांवर नियंत्रण ठेवले.

दिल्लीतील मुघल सम्राटाची सत्ता केवळ प्रतिकात्मक बनली, आणि ब्रिटिशांनी 1857 मध्ये दिल्लीचे पाटील बनवले.

संदर्भ:

"The Decline of the Mughal Empire" by M. A. Rizvi

"The Mughal Empire" by John F. Richards


6. 1857 चा स्वातंत्र्य संग्राम (सिपाही बंड)

1857 चा सिपाही बंड भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या लढ्यात रूपांतरित झाला. ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात दिल्लीतील बहादूर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली बंड झाले.

यामुळे भारतीय साम्राज्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा संघर्ष निर्माण झाला. त्यानंतर ब्रिटिशांनी मुघल सम्राटाचे वर्चस्व समाप्त केले आणि भारतात ब्रिटिश राज (Crown Rule) स्थापित केला.

संदर्भ:

"The First War of Indian Independence 1857-1859" by S.N. Sen

"The Indian Mutiny of 1857" by V.D. Savarkar


7. ब्रिटिश राज (1858) आणि सम्राट जॉर्ज पंचम

1857 नंतर, ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकार संपवले आणि ब्रिटिश राज स्थापन केला. ब्रिटिशांनी भारतातील सर्व प्रमुख प्रांतांवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले, आणि दिल्लीतील ब्रिटिश राजाची अधिकृत घोषणा केली.

1911 मध्ये दिल्लीला भारताची राजधानी म्हणून घोषित केले आणि ब्रिटिशांनी त्यांची राजधानी कोलकाता (काळी आणि राजधानी) पासून दिल्लीला स्थानांतरित केली.

संदर्भ:

"British Raj: A History of the British Empire in India" by Philip Woodruff

"The Making of Modern India" by Sumit Sarkar


8. भारताचा स्वातंत्र्य संग्राम (1947)

1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिश साम्राज्याने भारतीय उपखंडावर आपला वर्चस्व स्थापन केल्यानंतर, भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये विभागले गेले.

संदर्भ:

"India's Struggle for Independence" by Subhas Chandra Bose

"The History of Modern India" by Bipan Chandra


भारताच्या संविधानिक इतिहासाचे प्राथमिक टप्पे:


1. राणीचा जाहीरनामा १८५८

2. ⁠मिन्टो-मोरले सुधारणा (1909)

3. ⁠मॉन्टेग्यू-चेल्मसफर्ड समिती (1917)

4. ⁠सायमन कमिशन - 1927

5. ⁠नेहरू रिपोर्ट (1928)

6. ⁠गोलमेज परिषद – पहिली (1930-1931)

7. ⁠गोलमेज परिषद – दुसरी (1931)

8. ⁠ क्रिप्स मिशन (1942)

9. ⁠कैबिनेट मिशन (1946)



१. राणीचा जाहीरनामा (१८५८)

अठराशे सत्तावनचा उठाव शमल्यानंतर हिंदुस्थानातील प्रजेला उद्देशून इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीने काढलेला जाहीरनामा. १८५८ च्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया या अधिनियमानुसार हा जाहीरनामा घोषित करण्यात आला. या जाहीरनाम्याने हिंदुस्थानचा कारभार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून इंग्लंडच्या राणीकडे (ब्रिटिश शासनाकडे) विधिवत सुपूर्त करण्यात आला आणि १६०० पासून १८५८ पर्यंत या कंपनीने कमावलेले हिंदुस्थानचे साम्राज्य इंग्लंडच्या आधिपत्याखाली आले.


आपल्या धर्मात ढवळाढवळ होणार नाही, आपल्याला सक्तीने ख्रिस्ती केले जाणार नाही, ह्याचा दिलासा मिळाल्यामुळे सर्वसामान्य श्रद्धाळू जनतेला हायसे वाटले. 


1. मिन्टो-मोरले सुधारणा (1909):

1909 मध्ये ब्रिटिश सरकारने मिन्टो-मोरले सुधारणा लागू केली, ज्यामुळे भारतीयांना स्थानिक स्वराज्य प्रणालीमध्ये अधिक प्रतिनिधित्व मिळाले. या सुधारणा नंतर भारतीय नगरपालिकांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या आणि प्रांतिक विधानसभा स्थापन होऊ शकली.

संदर्भ: *"The Minto-Morley Reforms" by H.G. Rawlinson, published in The Cambridge History of India, Vol. 5: The Indian Empire


माँटेगू चेम्सफर्ड १९१७ चा कायदा आपण पोस्ट क्रमांक १२ मध्ये पाहणार आहोत.


तत्पूर्वी सदर पोस्ट ११ माहितीस्तव देत आहे.


बाबासाहेब संविधान सभेच्या पहिल्याच भाषणात म्हणतात की, “येथे जमलेले आपण सगळे युद्धजन्य छावण्यांचे नेते आहोत व मी देखील अशाचा एका छावणीचा नेता आहे.”आपण हे समजून घेतले पाहिजे की, भारतीय संविधान हे या युद्धजन्य छावण्यातील झालेला एक तह आहे. 


बाबासाहेब आपल्या भाषणात नेहमी आयर्लंडचे उदाहरण देतात. ब्रिटिशांपासून जेव्हा आयर्लंडला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा बहूसंख्याकांचा नेता रिएंडमंड आल्पसंख्यकाचा नेता कार्लसन याला उद्देशून म्हणतो की,माग तुला आता काय संविधानिक संरक्षण मागायचीत ती… त्यावेळी कार्लसन उत्तरतो की, चुल्यात घाल तुझे ते हक्क आणि अधिकार.. आम्हा अल्पसख्यांकास तुमच्या राज्यात शासितच व्ह्यायचे नाही.

लक्षात घ्या. अस्पृश्य समाजाची लोकसंख्या ही आयर्लंड, अमेरिका अथवा इतर देशाईतकी होती. परंतु बाबासाहेबांनी आयर्लंड प्रमाणे भूमिका घेतली नाही. बाबासाहेबांनी शासीत होणे स्वीकारले व या देशाचे अजुन एक विभाजन टाळले. त्यांनी त्यासाठी काही सांविधानिक संरक्षणे व तरतुदींची मागणी जरूर केली.

परंतु या तहात बाबासाहेबांना

अपेक्षीत states and minorities (book) मधील सर्व प्रावधाने मूळ संविधानात अंतर्भूत करता आले नाहीत. जी संविधानिक प्रावधाने हक्क आपणास मिळाले ते देखील प्रदीर्घ लढ्यानंतर व भीमसैनिकाच्या प्राणाची आहुती दिल्यानंतर मिळाले आहेत. हुतात्मा गांगुर्डे व इतर ३०० लोक जखमी झाले आहेत. (खंड १८ भाग ०३) जोगेंद्र नाथ मंडल यांचे सहकार्य,बुद्धसिंह महनल यांचा बंगाल मधील लढा असेल तसेच बंगाल मधील लकडी पूल नावाची वस्ती देखील जाळली गेली आहे. हा सगळा प्रकार बाबासाहेब संविधान सभेत निवडून येऊच नयेत म्हणून केलेला आहे. पटेलांनी तर संविधान सभेचे दारे,खिडक्या व तावदाने देखील लावली होती. ही लढाई आपण समजून घेतली पाहिजे.


Avengers 4 end game नावाचा एक हॉलिवूडपट आहे. त्यात Thanos नावाचा खलनायक आहे. अनेक सूपर पावर असणारे हिरो या चित्रपटात आहेत. या चित्रपटात एकूण पाच शक्ती मणी दाखवले आहेत. ते मणी जो परिधान करेल तो सर्वाधिक शक्तिशाली बनणार आहे. तो व्यक्ती अथवा तो गट या जगाचा संहारकर्ता, संरक्षणकर्ता, पुनर्निर्माण करता बनू शकतो. इतके ते मणी शक्तिशाली आहेत.आता ही जी सगळी चित्रपटातली लढाई आहे.  ती ते शक्ती मणी मिळवण्यासाठीची लढाई आहे.


आता आपण चित्रपटाकडून पुन्हा संविधानाकडे वळू. विधायका,कार्यपालिका,न्यायपाली का,मीडिया व लोक हे ते पाच शक्तिमणी शक्ती स्त्रोत आहेत.


हे नीट समजून घ्या की, भारतीय संविधानाचे महत्त्व का आहे. का ते विरोधक दिल्लीत भारतीय संविधान जाळतात? का त्याला विरोध करतात. का वारंवार त्याला बदलण्याची भाषा व बदलण्याचं काम करतात. त्याचं एकमेव कारण म्हणजे या देशातील सर्वाधिक शक्तिशाली पुस्तक हे भारतीय संविधान आहे. आणि ते संविधान बहुजनांच्या हिताच आहे. इथल्या दलित,आदिवासी,भटके, महिला व अल्पसंख्यांक यांना सत्तेचा व सन्मानाचा वाटा देणार पुस्तक आहे. हजारो वर्ष इथल्या अस्पृश्यांना महिलांना स्वतंत्र,समता, बंधुता व न्याय नाकारला गेला. त्यांना संधी देणारे हे पुस्तक आहे. इथल्या वर्ण वर्चस्ववादी शक्ती ना तेच नको आहे. किंबहुना तो त्यांचा अडसर आहे. म्हणून भारतीय संविधानाला त्यांचा विरोध आहे. व त्यांच्याकडून भारतीय संविधानाला कायम धोका आहे.

भारतीय संविधान

भारतीय संविधान

 

भारतीय संविधान






 

 

भाग एक

भारतीय संविधानाची मुळ हस्त लिखीत प्रत रामपूर येथील प्रेमबिहारी नारायण रायझाडा यांनी केले आहे. यासाठी वापरलेला पेपर हा मीनबॉर्न लोन पेपर आहे. त्याचा आकार १६.५ × ३०.५ इंच आहे. या कामासाठी ४०००/- रुपये खर्च आला. त्यानंतर या पानांवर अगदी मौर्य काळापासून ते स्वातंत्र्य लढ्यातील इतिहास चित्रित केला. हे काम शांती निकेतन मधील नंदलाल बोस यांनी केलं. या कामास २१,०००/- रुपये खर्च आला. हे संविधान आताच्या लोकसभा सचिवालयात आहे.

भारतीय संविधान हे कायद्याचे पुस्तक आहे. आपण त्याला नागरिक शास्त्राचे पुस्तक म्हणूया . ज्या पुस्तकात आपल्या जीवनाशी संबंधीत हक्क,अधिकार व कर्तवांची कर्तव्यांची माहिती दिली आहे. स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय प्रदान करणारे पुस्तक होय.

२६ नोव्हेंबर, १९४९ रोजी हे संविधान लिहून पूर्ण झाले. ते लिहिण्यासाठी संविधान सभेला २ वर्ष, ११ महिने आणि १७ दिवस लागले आहेत. त्या भारतीय राज्यघटनेत मूळत एकूण २२ भाग होते. या बावीस भागात ३९५ कलमे आणि ८ अनुसूची होत्या.

नंतर, ९ अ नगरपालिका, ९ ब सहकारी संस्था आणि १४ अ न्यायाधिकरण असे तीन भाग फेरबदल म्हणून जोडले गेले, ज्यामुळे एकूण भाग संख्या २५ झाली.  त्यामुळे भारतीय संविधानात आता २५ भाग ,४४८ कलमे, आणि १२ अनुसूची आहेत.

संविधान सभेची पहिली बैठक. दिनांक ९ डिसेंबर, १९४६ रोजी झाली. दिनांक २४ जानेवारी, १९५० रोजी संविधान सभेच्या सदस्यांनी संविधानाच्या प्रतींवर सह्या केल्या. आणि संविधान सभेचे काम संपुष्टात आले. या कालावधीत  ११ सत्र  व १६५ बैठका संपन्न झाल्या. २२ नोव्हेंबर, १९४९ पर्यंत संविधानावर ६३,९६,७२९  रुपये खर्च झाला होता.


आजपर्यंत १०५ घटना दुरुस्त्या देखील झाल्या आहेत.  लक्षात घ्या जरी कलमांची संख्या वाढली तरी एकूण कलम तुम्हाला ३९५ इतकेच दिसतील. हे लक्षात घेतले पाहिजे की भारतीय राज्यघटनेत कधीही नवीन कलम किंवा भाग जोडला जातो, तो वर्णक्रमानुसार केला जातो (उदाहरणार्थ, कलम 21 अ) जेणेकरून संविधानाच्या संरचनेत अडथळा येऊ नये.

संविधान समजून घेण्यासाठी आपण पुढील चार प्रकार प्रथम समजून घेऊ.

१. उद्देशिका Preamble 

२. ⁠२५ भाग.

(या २५ भागात अनुच्छेद Article (३९५) आहेत)

३. ⁠अनुसूची Schedule (१२)

४. परिशिष्ट Appendix.


१. उद्देशिका Preamble 

संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत सर्वश्रेष्ठ कायदा / त्याचे पुस्तक आहे. या संविधानातील उद्दिष्टे, हेतू, कायद्यातील तरतुदी यांची थोडक्यात आणि सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे ही उद्देशीका / प्रस्तावना होय. त्यातील प्रत्येक शब्दाला सखोल अर्थ आहे. संविधानाच्या प्रस्तावनेलाच ‘संविधानाचे प्रास्ताविक’ , ‘संविधानाचा सरनामा’ , किंवा ‘संविधानाची उद्देशिका’ असे म्हणतात.


उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता या तीन मूल्यांची हमी दिली आहे. उद्देशिकेचा इतिहास व त्यातील मूल्य यावर विस्तृत लिहिता बोलता येईल.

२. संविधानातील भाग/ प्रकरण.

भारतीय संविधानाचे भाग (Parts):

भाग १ – सामान्य प्रावधान ०१-०४

भाग २ – नागरिकत्व ०५-११

भाग ३ – मूलभूत अधिकार १२-३५

भाग ४ – सामाजिक व आर्थिक न्याय 

भाग ४अ – मूलभूत कर्तव्ये ३६-५१

भाग ५ – केंद्र सरकार ५२- १५१

भाग ६ – राज्य सरकार १५२-२३७

भाग ७ – स्थगित २३८

भाग ८ – राज्यांचे संबंध २३८-२४२

भाग ९ – पंचायती राज २४३

भाग ९अ – नगरपालिकांचे कायदेसंस्था ९ब- सहकारी संस्था 

भाग १० – राज्यपाल २४४

भाग ११ – केंद्र व राज्य यांच्यातील संबंध २४५-२६३

भाग १२ – केंद्र शासित प्रदेश २६४-३००

भाग १३ – न्यायालयीन पुनरावलोकन  ३०१-३०७

भाग १४ – न्याय व समानता ३०८-३२३

भाग १४ अ न्यायाधिकरण 

भाग १५ – राजकीय पक्ष व निवडणुका ३२४-३२९

भाग १६ ते २४ – विशेष प्रावधान ३३०-३४२

भाग १७ भाषा ३४३-३५१

भाग १८ आणीबाणी विषयक ३५२-३६०

भाग १९ मिश्र कलम ३६१-३६७

भाग २० संविधान दुरूस्थी ३६८

भाग २१ अनियमीत संक्रमण व विशेष तरतुदी ३६९-३९२

भाग २२ – संक्षिप्त रूपे,प्रारंभ आणि नीरसने ३९३-३९५

३. Schedules (अनुसूचियां):

भारतीय संविधानात Schedules (अनुसूचियां) खूप महत्वाच्या असतात. संविधानाच्या प्रारंभात विविध "Schedules" दिले आहेत, जे संविधानाचा अविभाज्य भाग मानले जातात.

संविधानाशी संबंधित प्रावधान: प्रत्येक Schedule मध्ये विशेष माहिती, अधिकार, कर्तव्ये किंवा विधेयकांचे (Acts) तपशील दिलेले असतात. उदाहरणार्थ, पहिली अनुसूची भारताच्या राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे नाम, राजधानी आणि सीमा यांचा तपशील देते.

४. Appendices (परिशिष्ट):

"Appendices" म्हणजे परिशिष्ट असतात, ज्यामध्ये मुख्यतः सहाय्यक किंवा अतिरिक्त माहिती दिली जाते. या माहितीचा संविधानाशी थेट संबंध नसतो, परंतु तो संबंधित कायद्याची अधिक स्पष्टता किंवा संदर्भ देण्यासाठी असतो.

विस्तारित माहिती: Appendices मुख्य दस्तऐवजाच्या भागात न समाविष्ट केलेली, परंतु त्याला सहायक असणारी माहिती असतात.

उदाहरण: एखाद्या कायद्याचे किंवा विधेयकाचे Appendices त्याच्या तपशीलवार सुसंगतीसाठी, उदाहरणार्थ इतर कायदे, तक्ते, दाखले इत्यादी समाविष्ट करतात.

फरक:

संविधानाच्या संदर्भात: Schedules हे संविधानाचा अविभाज्य भाग आहेत आणि संविधानाची कार्यप्रणाली किंवा समजण्यास मदत करतात, तर Appendices हे सहायक दस्तऐवज असतात, ज्यात अतिरिक्त माहिती किंवा स्पष्टीकरण दिले जाते, जे मुख्य दस्तऐवजाचा भाग नसून त्याला समर्थन करतात.

पुस्तक परिचय

 


भारताच्या राष्ट्रीयत्वाची व राष्ट्रवादाची जी परिकल्पना स्पृश्य हिंदू नेत्यांनी बनवली होती, तिला बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालील महाड सत्याग्रहाने छेद देत भारताच्या राष्ट्रवादाला वास्तव बनवण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्याची लढाई सर्वसमावेशक असली पाहिजे,आणि ती जर सर्वसमावेशक नसेल तर ती स्वातंत्र्याची नव्हे तर फक्त विशेष अधिकारांची लढाई ठरेल; बाकी सगळं केवळ सोंग ठरेल. बाबासाहेबांचा विरोध  ब्रिटिशांविरुद्ध सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीला नव्हता, तर अशा खोट्या स्वरूपांच्या लढायांना होता. हा नैतिक फरक जात-आंधळ्या इतिहासकारांना व संशोधक अभ्यासकांना लक्षात आला नाही.

गांधी प्रणित दांडी यात्रा जशी राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते, तिच्यावर चर्चा होते तशीच महाड सत्याग्रहावर मात्र चर्चा होत नाही, किंवा त्याकडे सम्यक दृष्टीने पाहिले जात नाही. अस्पृश्यांच्या गावकुसा बाहेरील वस्त्यांप्रमाणेच अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतील इतिहासालाही कोपऱ्यात ठेवून दुर्लक्षित करण्याचा सूडबुद्धीने केलेला हा प्रयत्न आहे. प्रस्तुत लेखक बोज्जा थारकम यांनी या विषयाकडे नेमके लक्ष वेधले आहे.

एक महाड आणि एक दांडी

या दोन घटनांमध्ये किंवा चळवळींमध्ये सारखेपणा कदाचित आढळूनही शकतो पण त्यांच्यात जशास तसे समांतर तुलना मात्र होऊ शकत नाही. ब्रिटिश  राजवट गांधींना शाप वाटत असेल तर हिंदू राजवट अस्पृश्यांसाठी शापापेक्षा भयंकर होती.ती एक अनिष्ट,निंदनीय गोष्ट असे तसेच अखिल मानवते विरूद्ध गुन्हा होता.

मुंबई विधिमंडळात 1923 मध्ये एस.के.बोले यांनी मांडलेला ठराव मंजूर करून महाड नगरपालिकेने 1926 मध्ये काही दुरुस्त करून त्याला मंजुरी दिली आणि अस्पृश्यांसाठी चवदार तळे खुले केले. तथापि नगरपालिकेचा ठराव हा केवळ कागदी ठरावच राहिला. तथाकथित उच्च वर्णियांच्या हिंसेच्या भीतीने अस्पृश्यांना त्यांचा हक्क बजावता आला नाही.

महाडचा सत्याग्रह 19 / 20 मार्च,1927 रोजी सुरू झाला आणि 25 डिसेंबर 1927 रोजी  (मनुस्मृती दहन) पर्यंत तो जारी  होता. तरीही आणखी १० वर्षे त्याची कायदेशीर लढाई सुरूच होती. तर दांडी यात्रा 12 मार्च 1930 मध्ये सुरू झाली आणि 05 एप्रिल 1930 रोजी 25 दिवसात समाप्त झाली. दांडी ही शांततापूर्ण पदयात्रा होती. तेथे कोणाला अटक नव्हती,हिंसाचार नव्हता,मोर्चेकरी हल्याने रक्तबंबाळ नव्हते, खटले, भुकेलेले,अनवाणी,अस्पृश्य स्त्रिय-लेकर व असे लोक नव्हते. दांडी हा पूर्णपणे पटेलांच्या नियोजनात अनुकूल परिस्थितीत अंमलात आला तर त्याच्या अगदी उलट प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाड सत्याग्रह झाला. असं जरी असला तरी दांडी पदयात्राचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांनी भरभरून कौतुक केले. मात्र महाड सत्याग्रहावर लेख, पुस्तक, ग्रंथ किंवा साहित्य वर्तुळात किमान एक दोन ओळी देखील फार खरडल्या गेल्या नाहीत. पत्रकारांनी त्याची फार दखल देखील घेतली नाही.

सदर पुस्तकातून या दोहोंमधील नैतिक, सामाजिक-राजकीय, आर्थिक स्वरूप मांडले आहे.शीर्ष नेतृत्वाची हाताळण्याची पद्धती देखील मांडली आहे.

Tuesday, 19 November 2024

बौद्ध धम्म आणि मानवता



(करुणा बुद्ध विहार, मांडा टिटवाळा पूर्व येथे दिनांक १३ ऑक्टोबर,२०२४ रोजी सदर केलेल्या प्रवचनाचा भाग येथे मांडत आहे)


जे लोक श्रद्धाळू असतात ते आपसूकच धर्मावर श्रद्धा ठेवतात. परंतु जे लोक चिकित्सावादी असतात अशा व्यक्तींना डोळस व विज्ञानवादी, आचरण धम्म देण्याचे काम बुद्धांने केले आहे. म्हणून बुद्धांचा धम्म हा बुद्धीचा धम्म आहे. हा बुद्धीवादयांचा धम्म आहे असे म्हणतात. येथे येण्याची कुठली अट नाही. तुम्ही जर किमान समजू शकत असाल,विचार करण्याच्या प्रक्रियेला तयार असाल... तर बुद्ध म्हणतात *"एहि पस्सिको"* या.. पहा.. मानण्याची पूर्वअट नाही. अनुभवा.. आणि पटलं.. तर स्वीकारा.


जगभरातील धर्म हे व्यक्तीला धार्मिक घोषीत करण्यापूर्वी अथवा धर्मात प्रवेश देण्यापूर्वी त्या धर्मावर त्याची श्रद्धा असणे हे प्राथमिक मानतात. जुनी पुराणे, गाथा, अपौरुषी शास्त्र हे त्यासाठी प्रमाणभूत मानतात. 


बुद्धांचा धम्म हा कुठल्याही शास्त्रातून जन्मलेला नाही. तर तो बुद्धांच्या तत्वज्ञानातून, शिकवणुकीतून व अनुभवातून जन्मलेला आहे.बुद्धांचा धम्म हा प्रश्नोत्तरातून, विश्लेषणातून व मानवी नैतीक मूल्यांतून जन्मलेला विचार आहे. त्यामुळे बुद्धांचा आग्रह नाही की, मी सांगतो तेच बरोबर माना अथवा असा कुठलाही दावा ते करत नाहीत. त्याउप्पर ते काळानुरूप योग्य ते बदल स्वीकारण्यास तयार आहेत व तशी मुभा धम्मात देतात.


विचार करा तुम्ही जी श्रद्धा ठेवता. त्या श्रद्धाजर डोळस नसतील? स्व:अनुभवातून, विचारातून, चिंतनातून मंथनातून आलेल्या नसतील? तर अशा श्रद्धा व उपासना खऱ्या असतील काय? तुम्ही ज्या उपासना,पद्धती करता ते केवळ एक दिखावा ठरून पोकळ आचरण ठरणार नाही काय? आशा पोकळ विधीतुन मग अंधश्रद्धा निर्माण होणार नाही काय? म्हणून तथागत गौतम बुद्धांनी पहिल्यांदा सांगितलं की धर्माची/धम्माची /धार्मिक होण्याची पहिली पायरी ही श्रद्ध नसून स्वानुभव, स्वविचार स्वसंमती असली पाहिजे.

या जगात अनेक धर्म संस्थापकांनी मी देव आहे. मी देवाचा अवतार आहे. मी देवाचा पुत्र आहे. मी देवाचा संदेशवाहक आहे. अशा थापा मारलेल्या आहेत असे आपल्या निदर्शनास येते. परंतु बुद्धाने अशी कोणतीही वालग्ना केली नाही. त्यांनी मी मानव पुत्र आहे. मी कुणीही मोक्षदाता नसून मी केवळ मार्गदाता आहे असे सांगितले आहे. आणि हीच गोष्ट त्यांच्या धम्माल मानवीय बनवते.

ज्ञानप्राप्ती नंतरची त्याची साक्ष देणारी भूमीस्पर्शमुद्रा हे त्याचे उत्तम उदाहरण होय.


माणसाने माणसाशी कसे वागावे ही शिकवण बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू होय.या जगात कुणी मोक्षवाद सांगितला,कुणी आत्मावाद, दैववाद, स्वर्गवाद, मनुवाद,जातीवाद असे निरनिराळे इसम व वाद सांगितले परंतु बुद्धाने आपल्या धम्मातून केवळ मानवतावाद सांगितला.

बुद्धांनी पाप,पुण्य,पुनर्जन्म, स्वर्ग,नरक, आत्मा परमात्मा यांना तिलांजली दिली. तुम्ही मागीलजन्मी काय होते, पुढील जन्मी काय होईल हे न सांगता. वर्तमान जन्मात तुम्ही दुःखमुक्त जीवन कसे जगू शकता हे मानवाला सांगितले. मृत्यू नंतर काय होईल त्यापेक्षा तुम्ही जिवंतपणी निर्वाण,निर्दोष जीवन कसे जगू शकता हे संगितले.


बुद्धांनी मानवाच्या कल्याणासाठी प्रथम अरीहंत झालेल्या ६० भिक्षूंना निरनिराळ्या दिशांना पाठवले. त्यांना पाठवितांना 

*बहुजन हिताय*

*बहुजन सुखाय*

असा मानवजातीच्या कल्याणाचा संदेश दिला.

त्यामुळे बुद्धाच तत्वज्ञान हे केवळ एक व्यक्तीच्या विकासाचे तत्वज्ञान नसुन संपूर्ण समाजाच्या   सामूहिक क्रांतीचे ते मानवतावादी तत्वज्ञान आहे.


समानता हे मानवतावादी मूल्य त्यांनी संघात देखील जोपासले. संघात सुनित नावाचे भंगीसमाजाचे भन्ते होते. न्हावी समाजाचे उपाली जे विनय पिटकाचे प्रमुख देखील होते. चर्मकार समाजाचे सोपान,आम्रपाली गणिका, किसा गौतमी अबला आणि दरोडेखोरी करणारा अंगुलीमान देखील होते.


बुद्धांच्या या मानवतावादी धम्माचे दोन भागात विभागणी करून पाहता येईल. एक जो शिकवणुकीचा भाग आहे. आणि दुसरा तत्वज्ञानाचा भाग आहे.

*शिकवणुकीत* आपण 

1. त्रिसरण (बुद्ध,धम्म,संघ)

2. चार आर्य सत्य

 (दुःख, कारण, समाप्तीचे सत्य, दुःख समाप्ती)

⁠3. पंचशील 

(हिंसा,चोरी,व्याभीचार,खोटे,मद्यपान  न करणे.)

4. अष्टशील

(विकाल आहार,करमणुकीच साधन,सुगंधीत द्रव्ये व इतर अलंकारांपासुन दुर राहण्याचे शील ग्रहण करणे .)

5. दसशील 

( उच्च आसन व स्वर्ण आलंकारापासून अलिप्त राहणे)


ह्या चारही प्रकारात शिलांची विभागणी वेगवेगळी केली आहे. गृहस्थ आणि गृहीणींकरीता पाच शील आहेत, उपासक आणि उपासिकेसाठी आठ शील तर श्रामणेर आणि श्रामणेरींकरींना दहा शिलांचे पालन करावे लागते.


6. आर्य अष्टांगिक मार्ग

(सम्यक दृष्टी,सम्यक संकल्प,सम्यक वाणी,सम्यक कर्मांत,सम्यक उपजीविका,सम्यक व्यायाम,सम्यक स्मृती,सम्यक समाधी)

7. दस पारमिता 

(दान', 'शील', 'नैष्कर्म्य', 'प्रज्ञा', 'वीर्य', 'क्षान्ति', 'सत्य', 'अधिष्ठान', 'मैत्री' व 'उपेक्षा' ya या परमीताचा समावेश होतो.)


तर तत्वज्ञानात आपण 

1. प्रतुत्यसमुत्पाद

2. अनात्मवाद

3. अनित्यवाद

4. पुनर्जन्म सिद्धांत

5. कर्म सिद्धांत


इत्यादीचा समावेश होतो. 


धम्म म्हणजे नीती,धम्म हा मानवी मनावर मानवतावादी विचार रुजवणारा संस्कार होय. आणि म्हणून धम्म म्हणजे मानवता अथवा मानवता म्हणजे धम्म असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


धन्यवाद!


संदर्भ: १. धम्मपद- ओशो 

२. बुध्धम्माचे सार- पी एल नरसू 

३. ⁠बुद्ध चरित्र- प्रा डी डी कोसंबी 

४. ⁠बुद्ध आणि त्यांचा धम्म-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

५. ⁠सर्वोत्तम भूमिपुत्र- अ ह साळुंखे 

चळवळ



जगभरात उपलब्ध धर्म, पक्ष,संघटना विचारसरणी,अथवा नेतृत्व याचे परफेक्ट मॉडेल जिवंत अथवा ऐतिहासिक देखील असू शकत नाही. ते कधीच असत नाही. तसे झाले असते तर निरनिराळ्या संघटना,धर्म,नेते इत्यादी उदयास व लयास कधी गेले/गेल्या नसत्या.

आपल्याला अपेक्षित नेता,धर्म,पक्ष,संघटना कशा असायला हव्यात. याचे आपले काही ठोकताळे असतात. ते ठोकताळे आपल्याला आलेले अनुभव, समस्या आणि आपल्या मर्यादित सामाजिक शैक्षणिक,भौगोलिक,ऐतिहासिक ज्ञान/ अज्ञान या सर्वाचे झालेले आकलन व त्याचा आपण लावलेला अन्वयार्थ या गोष्टीवर अवलंबून असतो . 

परंतु व्यक्तीचे अनुभव अथवा ज्ञान हे काही वैश्विक अथवा कालातीत असत नाही. त्याला अनेक आर्थिक,भौगोलिक,सामाजिक मर्यादा असतात. 

त्यामुळे वर्तमानातील उपलब्ध पर्यायांपैकी अधिक उचित / योग्य/ परफेक्ट पर्याय निवडणे अथवा निर्माण करणे. ही प्रक्रिया असते असे मला वाटते. 

ज्यांना-ज्यांना म्हणून परिवर्तन हवे आहे. त्यांना या प्रवाहात यावेच लागेल. प्रवाहाच्या बाहेर राहुन केवळ निरर्थक उपदेश अथवा टीका-टिप्पणी करता येईल. जे करणे सोपे ही आहे. नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तिरावर जाण्यासाठी पाण्यात उतरणे ही एकमेव अनिर्वार्यता असते. त्यामुळे ज्यांना परिवर्तन हवे त्यांना पाण्यात/ संघटनेत उतरावेच लागेल. व तो प्रवाह योग्य दिशेने न्यावा लागेल. 

संघटनेत उतरणाऱ्या व्यक्तीला त्याचा हेतू स्पष्ट असावा. तुम्ही चळवळीला देण्यासाठी आलात की घेण्यासाठी हे स्पष्ट असावे. असे जरी असले तरी चळवळीच्या नावाने भावनिक करून अनेकांना राबवून/ वापरून घेण्याचा प्रकार देखील होतो. त्यामुळे विद्यार्थीदशेत आपण विद्यार्जन करावे. आपला स्वाभिमान जपता येईल इतके अर्थार्जन करावे. कारण बौद्धिक व आर्थिक दुर्बल कार्यकर्ता चळवळ दुबळी करतो. ज्यांना लिहिता येईल त्यांनी लिहावे, बोलत येईल त्यांनी बोलावे, आर्थिक दान देता येईल त्यांनी ते करावे. परंतु कार्यकर्त्याने आपल्या क्षमता व मर्यादा ओळखून चळवळीत उतरावे.

लक्षात घ्या. चळवळ अथवा त्यातील नेते,पदाधिकारी हे काही परग्रहावरून येत नाहीत. त्यामुळे त्यांना राग,प्रेम,लोभ,मद, मोह,मत्सर असते. या सगळ्यांतून सगळेच यशस्वी होऊन बाहेर पडत नाहीत. त्यामुळे तुम्ही संकटातून सम्राट अशोकाच्या मार्गाने जाता,की बुद्धांच्या मार्गाने जाता, की बाबासाहेबांच्या मार्गाने जाता हे तुमच्या क्षमतेवर अवलंबून असते.

Sunday, 17 November 2024

कार्तिक पौर्णिमा- २०२४

 





प्रवचनात कार्तिक पोर्णिमेचे महत्व खालील प्रमाणे विषद करण्यात आले. 

१. काश्यप बंधूंची धम्मदीक्षा: बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात दुसऱ्या खंडातील तिसऱ्या भागात सदर प्रसंग वर्णिला आहे. वाराणसी नजीक निरंजना नदी काठी उरवेला आश्रमात हे काश्यप बंधू स्थीत होते. 

i .उरवेल काश्यप ii . नदी काश्यप  आणि iii . गया काश्यप अशी त्यांची नावे होत. ते अग्निपूजक व ब्राह्मण गोत्राचे होते. त्यांच्या डोक्यावरील खांद्यापर्यंत लांब केसांमुळे त्यांना जटील/ जटाधारी म्हणतअसत.परिसरात त्यांना प्रतिष्ठा होती. जवळपास १००० शिष्य त्यांचे होते.  त्यांनी कार्तिक पौर्णिमेला धम्मदीक्षा घेतली. वयाच्या १४५ व्या वर्षी कार्तिक पौर्णिमेला उरवेल काश्यप यांना निर्वाण प्राप्त झाले.

२. सारीपुत्त व महामोग्गलायन यांची धम्मदिक्षा : राजगृहात संजय वेलठी यांचे दोन शिष्य होते. उपतिष्य आणि कोलीत. इतरही २५० असे शिष्य होते. उपतिष्य आणि कोलीत यांच्या शंकांचे निरसन अद्याप झाले नव्हते. त्यांनी आपसात ठरवलेलं की ज्याला प्रथम सत्य सापडेल तो दुसऱ्याला सांगेल. राजगृहात बुद्धांचे शिष्य भदंत आनंद यांचे चालणे,बोलणे वागणे व विचार यातून हे दोन्ही शिष्य प्रभावीत झाले. त्यांचे गुरु कोण आहेत? त्यांची शिकवण काय आहे? मार्ग काय आहे? हे सगळे जाणून त्यांनी बुद्धाच्या संघात प्रवेश घेतला व सोबत २५० शिष्य ही आले. उपतिष्य व कोलीत यांचे अनुक्रमे सारीपुत्त व महामोग्गलायन असे नामकरण झाले.    

सारीपुत्त व महामोग्गलायन हे पुढे संघाचे सेनापती व बुद्धांच्या डाव्या व उजव्या भुजा बनले. राहुलचे धम्मगुरू हे सारीपुत्त होते. यावरून त्यांचे महत्व कळते.  इ.स. पूर्व ४८४ मध्ये कार्तिक पोर्णिमेला त्यांनी इच्छामरण स्वीकारले. बुद्धांच्या हयातीतच त्यांचे चैत्य स्तूप श्रावस्थी येथे निर्माण केले. त्यानंतर लगेच १५ दिवसांनी म्हणजे कार्तिक अमावस्येला जैन धर्म प्रचारकांनी (निकंठक) यांनी महामोग्गलायन यांची हत्या केली. 


३. मूलगंध कुटीर विहार

चक्रवर्ती सम्राट अशोकाने नालंदा तक्षशिला निर्माण केले. नालंदा आता भारतात तर तक्षशिला पाकिस्तानात आहे. श्रीलंकेचे पूज्य अनागरिक धम्मपाल यांनी भारतात येऊन तक्षशीलेतून बुद्धांचे अस्थिकलश आणून सारनाथ येथे आधुनिक मूलगंध कुटी विहार निर्माण केले. कार्तिक पौर्णिमेला या अस्थींचे पूजन व मिरवणूक होते.

संदर्भ:

१. बुद्ध धम्म में ऐतिहासिक पौर्णिमायेकां महत्त्व- भदंत आर धम्मीकुर थेरो पान क्रमांक ५१,५२

२. ⁠बुद्ध आणि त्यांचा धम्म ( खंड दोन भाग तीन) - डॉ. बाबासाहेब 

३. ⁠वर्षावास आणि बारा पोर्णिमा - डॉ. लता धनराज

Thursday, 8 August 2024

प्रश्न विचारावेत का?

प्रश्न विचारावेत का?

 प्रश्न विचारणारे मिलिंद नको, तर उत्तर देणारे नागसेन व्हा! हे वाक्य कानाला ऐकायला जरी छान व टाळ्या खाऊ असेल, तरीही प्रश्न विचारू नका. हा ध्वनीत होणारा अर्थ, हा मेसेज प्रचंड घातक आहे.


पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीचा पायाच मुळी येथील वेद, उपनिषीद,धर्म व तत्त्वज्ञान यांना प्रश्न विचारण्यात आहे. चार्वाक,जैन महावीर व बौद्ध हे नास्तिक तत्वज्ञान, दर्शन हे मुळात येथील प्रचलीत समाज व्यवस्थेला प्रश्न विचारणारे व त्यातून समाधानकारक  उत्तर न मिळाल्याने नास्तिक मार्ग,कैवल्य व निर्वाणाचे (निब्बाण) तत्वज्ञान स्वीकारणारे दर्शन आहे.


झाडाखाली बसून डोळे मिटून ज्ञानप्राप्ती होत नाही. त्यासाठी अगोदर प्रश्न पडावे लागतात की या जगात दुःख का आहे? आहे तर त्याचे कारण काय आहे? त्यावर उपाय काय करता येईल? हे सर्व करण्यासाठी अलारकलाम पासून तर उदकरामपुत्त यांना प्रश्न विचारावे लागतात. त्यानंतरही शंकेचे निरसन व मार्ग सापडत नसेल तर मिळालेल्या ज्ञान,अनुभव व उत्तरांच्या, प्रंचड चिंतनाचा कसोट्या व पायऱ्या चढल्यावर मध्यम मार्गाचा बोध होत असतो. त्यासाठी निमित्तमात्र ही सुजाता व पूंना (पूर्णा) ठरत असते.


कुठल्याही शोधाची जननी ही केवळ गरज नसून जिज्ञासा देखील असते हे विसरून चालणार नाही. धर्माला सिद्ध होण्यासाठी विज्ञानाची गरज भासते. कारण धर्म हे तत्त्वज्ञान (Philosophy, Meta Physics) आहे. विज्ञान हे स्वयं सिद्ध असते कारण अनेक वारंवरतेच्या कसोट्या पार करून ते सिद्ध होते. तरीही विज्ञान अंतिमतः हेच सत्य आहे असा दावा करत नाही. त्याउलट प्रश्न विचारण्याची मुभा ते देते. आईन्स्टाईन ला चुकीचे ठरवून नोबेल मिळालेत ते विज्ञानातच.अपौरुषी धर्मात मात्र ती मुभा नाही.


अनेक धर्म विज्ञानवादी असण्याची थाप मारतात. मुळात तशी गरज नाही. विज्ञान व तत्वज्ञान (दर्शन)  हे वेगवेगळे आहेत. जे धर्म प्रचारक अशी थाप मारतात तयांनी मलिंदाला नाकारावे हे तर चूकच.


बालबुद्धीने प्रश्न विचारूनये का? प्रश्न न विचारता आलेल्या आदेशाचे केवळ पालन करणाऱ्या भक्त जमातीने आजवर केलेले नुकसान काय कमी आहे?  सद्सद्विविवेक बुद्धी गहाण ठेवणारे संघटनेसाठी चांगले असतात हे जरी मान्य केले तरी बुद्धांनी प्रश्न विचारा यासाठी प्रचंड आग्रह केलेला आहे. कलामांच्या प्रश्नाचे उत्तर कलामसुत्ततात दिलेच आहे की..


क्रमशः

Friday, 5 July 2024

बुद्ध आणि प्रेम

बुद्ध आणि प्रेम

 डोळ्यांनी आपल्याला जग केवळ दिसते. त्या दिसणाऱ्या जगाची अनुभूती हे आपल्या मनावर अवलंबून असते.


मनावर सर्वाधिक गारुड जर कुणाचं असेल तर ते प्रेमाचे असते. प्रेमात असणाऱ्या व्यक्तीला कडक उन्हात देखील सावलीची अनुभूती आणि चिंब सरींची बरसात जाणवू शकते. बाहेरच्या कर्णकर्कश हॉर्नसच्या आवाजात देखील त्याच्या कानात व्हायोलीन वाजू शकते. 


प्रेमात असणाऱ्या प्रियकराला आपली प्रियसी ही जगातील नितांत सुंदर स्त्री वाटत असते. 


आईला स्वतःचं बाळ हे जगातील सर्वाधिक गोंडस बाळ वाटतं असतं.


एखादया व्यक्तीकडे, वस्तूकडे, ठिकाणाकडे, नात्याकडे जेव्हा तुम्ही प्रेमाने पाहता तेव्हा ती वस्तू, व्यक्ती, ठिकाण हे सूंदर बनते. ही सूंदर बनवण्याची किमया प्रेमात असते.


अहिंसकाचा अगुलीमान व अगुलीमानाचा अरहंत बनण्याचा प्रवास हे त्याचे उदाहरण.


बुद्धाची करुणा ही दुसरं तिसरं काही नसून मानवी समाजासाठी असणारे प्रेम आहे. अन्यथा कोण राजकुमार आपली ऐश्वर्यसंपन्न जीवनशैली सोडून उपाशी-तापाशी, राना वनात आत्मक्लेश सहन करेल? 

आणि ते मिळालेले ज्ञान प्रत्येकाला लोक भाषेत समजावून सांगेल? वयाची ४५ वर्ष लोककल्याणासाठी खर्च करेल?


असे महानायक व अतुलनीय, अविश्वसनीय कहाण्या या निर्व्याज व निस्सीम प्रेमातूनच जन्माला येऊ शकतात.

Tuesday, 7 November 2023

आंबेडकरवादी नेतृत्व हवे.


संघटन, संभाषण व संविधानिक कौशल्य तसेच फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे आकलन नसणाऱ्या व्यक्तीस कुठल्याही सामाजिक, शैक्षणिक अथवा राजकीय  संघटनेत पद, प्रतिष्ठा अथवा नेतृत्व दिल्यास संघटन निकामी, निकृष्ट व सैरभर न झाले तर नवलच.


जो समाज उच्च शिक्षित झाला. नीतिमत्ता हे मूळ तत्वज्ञान ज्या बौद्ध धम्माचे आहे. ते तत्वज्ञान स्वीकारून ६७ वर्ष ज्या समाजाला झाले. शिकावा, चेतवा व संघटीत व्हा असे सांगून ९९ वर्ष ज्या समाजाला झाले. म्हणजेच "शिक्षा" आणि "दीक्षा" दोन्हीही उत्तम ज्या समाजाकडे आहे. अशा समाजाने यापुढे आपले नेते, पुढारी व मार्गदर्शक निवडतांना अतिशय बेजबाबदार, अंध व परंपरागत असून कसे चालेल?


आपले नेते मग ते धार्मिक, राजकीय किंवा सामाजिक असतील. ते देश, राज्य अथवा गल्ली बोळातील असतील.. अगदी तुमच्या संघटनेचे, जयंती मंडळाचे किंवा बचतगटाचे असतील... असे नेते,प्रमुख निवडतांना या प्रबुद्ध,वाचक व शिक्षित समाजाने चोखंदळ असायला नको का?


ज्या बौद्ध धम्माचा वारसा,विरासत आणि विचार आपण चालवू इच्छीतो. ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, शैक्षणिक,राजकीय व धार्मिक चळवळीचे नैतिक वारसदार म्हणून आपण स्वतःला म्हणवून घेतो. त्या समाजाचे आचरण व  नेतृत्व देखील त्याला 

साजेसे नको का?


केवळ मंत्रोच्चारा प्रमाणे आंबेडरवाद व बौद्ध धम्माचे विचार मांडायचे परंतु आचरण मात्र विपरीत व विरुद्ध करायचे हे असे किती दिवस चालायचे?


लक्षात घ्या बाबासाहेब यशस्वी झाले ते त्यांच्या ठायी असणाऱ्या ज्ञान व शील या गुणामुळे.



पुणे कररातून निपजलेल्या निर्बुद्ध   निकृष्ट नेते तुमच्या स्वाभिमानाची लढाई लढणारे नाहीत. स्वतःच्या स्वार्थासाठी दुरदृष्टी नसणारे हे नेते चळवळीला संपवतील. म्हणून येणाऱ्या काळात नेतृत्वाला नेते होण्यासाठी आंबेडकरवादी होणे, बौद्ध धम्माचे पाईक होणे ही प्रथम कसोटी असलीच पाहिजे.

Wednesday, 25 October 2023

अशोका विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन




१४ ऑक्टोबर, १९५६  या दिनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहा लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली. त्या क्रांतिकारी,अभूतपूर्व व ऐतिहासिक घटनेला आज ६७ वर्ष पूर्ण होत आहेत.  त्यानिमित्ताने या ६७ वर्षात आपण काय केले याचा हिशोब, पडताळणी व सिंहवलोकल  करावयास हवे.


मी तीन मुद्यांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो:

🔵 एक

 अस्पृश्य समाजातील अनेकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.  त्या दीक्षे नंतर त्यांच्या जीवनमानात क्रांतिकारी व अमुलाग्र सकारात्मक बदल झाले.  जगाच्याच्या इतिहासात इतक्या अल्पावधीत व इतक्या प्रचंड वेगाने कुठल्याही समाजाने प्रगती केलेली नाही. अशी प्रगती या समाजाने केली. हा बदल बाबासाहेबांच्या आणि बुद्ध धम्माच्या विचारांची कास धरल्यामुळे,  शिक्षणामुळे, खुळचट धर्मकल्पना व अंधश्रद्धा नाकारल्यामुळे त्यासोबत मिळालेल्या संविधानिक अधिकारामुळे झाला आहे. 


असे असले तरी सारेच काही आलबेल आहे असे नाही. हा धम्मरथ भारत बौद्धमय करण्याच्या दिशेने अपेक्षित वेगाने पुढे सरकताना दिसत नाही.


त्याला कारण आपल्या शेजारी असणारे मांग व चर्मकार बंधूंना देखील आपण बौद्ध धम्म दीक्षा देऊ शकलो नाही.


🔵 दोन

स्वतःस पुरोगामी आणि आंबेडकरवादी अशी दुहेरी ओळख  असणाऱ्यांनी देखील बुद्ध धम्माला अस्पृश्य ठरवून जाणीवपूर्वक बुद्धधम्माला बगल दिली आहे.  बुद्धांचे तत्वज्ञान आम्ही मानतो. स्वीकारतो परंतु धम्म स्वीकारण्याची हिंमत व धमक नसणाऱ्यांमुळे देखील धम्मारथ अडकला आहे. मुळात आंबेकरवाद अथवा आंबेडकरवादी होण्यासाठी तुम्हाला धम्माचे तत्वज्ञान हे  स्वीकारणे अनिर्वार्य आहे. कारण बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन चरित्राचे सार हे धम्माधारीत आहे. 


सेलेक्टिव्ह आंबेडकर स्वीकारणे हे पळपुटे पणाचे व समाजाच्या करंटेपणाचे लक्षण आहे. आंबेकरवाद हा धम्म दीक्षेविना पूर्ण होऊच शकत नाही. आंबेकरवादाचे सर्वोत्तम व सर्वोच्च टोक हे बाबासाहेबांची धम्मदीक्षा आहे. दस्तुरखुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकर या देशातील लढाई ही श्रमणवाद विरुद्ध ब्राम्हणवादी अशीच आहे असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही दगडावर पाय ठेवून असणारे (पुरोगामी + आंबेडकरवादी) हे धर्मांतराच्या रथाला खीळ घालणारे लोक आहेत असे मी मानतो. 


🔵 तीन

आता ज्यांनी धम्म स्वीकारला आहे. त्यांनी देखील आपल्या चालण्या बोलण्या व वागणुकीतून समाजासमोर आदर्श निर्माण केला पाहिजे.


१४ जानेवारी,१९५१ रोजी वरळी बुद्धविहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्याख्यान झाले. त्यात ते म्हणाले की, "बौद्ध होणे सोपे नाही. म्हणून मी काही नियम करणार आहे. ते नियम जे लोक पाळतील त्यांनाच दीक्षा दिली पाहिजे. बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुद्ध धम्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही." शिवाय, ज्या हिंदूंना धम्मदीक्षा घ्यावयाची असेल त्यांनी हिंदू धर्माच्या दृष्कृत्यांचा त्याग केला पाहिजे. जातीला मानणारे लोक बौद्ध होतात आणि बुद्ध धम्माचा ब्राह्मणी धर्म बनवतात, अशांना बुद्ध धम्मात येता येणार नाही. ज्यांना सवड असेल त्यांनी येथे   यावे, बुद्ध धम्म शिकावा व त्यानंतर त्याचा स्वीकार करावासा वाटला तर करावा. नाहीतर बाराभाईची खिचडी करून चालायचे नाही. फक्त बुद्ध धम्मच पाळा इतर काही नाही."


धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

जय✺भीम.

नमो✺बुद्धाय

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

Thursday, 28 September 2023

आमच्या पूर्वसूरींच्या मार्गानेच आम्ही जाणार

आमच्या पूर्वसूरींच्या मार्गानेच आम्ही जाणार



धर्मांतर करतांना बाबसाहेबांनी २२ प्रतिज्ञा दिल्या. त्या प्रतिज्ञा पूर्वाश्रमीच्या महार समाजाला दिल्या. बाबासाहेबांना हे ज्ञात असावे की, आपण ज्या नरकातून या समाजाला बाहेर काढले आहे. त्याच मार्गाला काही नमुने परत जाण्याचा प्रयत्न करतील. म्हणून बाबासाहेबांनी मुस्लिम, ख्रिश्चन अथवा इतर धर्माचा २२ प्रतिज्ञांमध्ये कोठेही उल्लेख केलेला आढळत नाही. धर्मांतराला आता जवळपास ६६-६७ वर्षे इतका कालावधी उलटून गेला आहे.


या ६६-६७ वर्षात देखील अगदी मूलभूत प्रबोधन ज्या नमुन्यांचे झाले नाही. त्यांना वाऱ्यावर सोडून द्यावे. प्रबोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे हे जरी मान्य केलं तरी; ज्यांना गुलामीचे साखळदंड हे सौंदर्य अभूषणे वाटावीत? इतका उच्च प्रतीचे गाढवंपण कुठून शिकतात हे लोक? अशांना कात्रजचा घाट दाखवलेले उत्तम.


प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कुणाचा सामाजिक बहिष्कार करणे हे कायद्याचा चौकटीत उचित ठरणार नाही. मात्र ज्यांनी हजारो वर्षे जातीच्या नावावर शोषण केलं त्यांनी हा उपदेश देऊ नये. 


बहुसंख्य समाजाचे अनुकरण, लागूनचालन हे जगभरात सुरू असते. अशावेळी अल्पसंख्याक समाज हा सर्व स्तरावर सुदृढ व सशक्त नसेल तर तो शरणागती पत्करतो. शरणागती न स्वीकारणारे शिकार देखील होऊ शकतात. शरणागती पत्करणारे देखील दुय्यम स्थान अथवा गुलामी स्वीकारतात.


भारतात बहुसंख्य समाज हा आक्रमक, अनधिकृत, अतिक्रमण व बुद्धिभेद करत असतांना असे घरभेदी पालखीचे भोई नसलेलेच बरे. असे घरभेदी केवळ गणपती बसवणारेच आहेत असे नाही. तर जेजे म्हणून आंबेडकरी विचारांना सामाजिक, राजकीय, धार्मिक ठिकाणी स्वतःचे गल्ले भरण्यासाठी वापरतात; व चळवळ सरंजामी सनातन्यांच्या दावणीला बांधतात. ते सगळे सारखेच कृतघ्न आहेत.


सामाजिक व राजकीय मंचावर सामाजिक सौदाऱ्याची भुमीका घेणे मी समजु शकतो; परंतु नको ते थोतांड घरात आणणे. त्या धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक दहशतवादी संघटनेचा भाग बनणे म्हणजेच पालखीचे भोई बनणे होय.


आपली कार्यशक्ती ही केवळ प्रतिक्रियावादी होण्यात अथवा पालखीच्या भोईंना सुधारण्यात घालवणे मला उचीत वाटतं नाही. जे सोबत आहेत त्यांना नवं निर्माणासाठी व आपल्या ध्येय उशिष्टांना पूर्ण करण्यासाठी ही शक्ती वापरावी या मताचा मी आहे. आपली स्वतःची शक्ती व उपद्रवमूल्य सिद्ध केल्याखेरीज चळवळ फोफावणार नाही.